Wednesday, June 6, 2012

*लाल, हिरवा, निळा, पिवळा... अशे अनेक रंग... पण त्यातला खरा रंग कुठला...

*लाल, हिरवा, निळा, पिवळा... अशे अनेक रंग... पण त्यातला खरा रंग कुठला...
खरं सांगायचं तर कुठलाच नाही...
हे सगळे फक्त उघड्या डोळ्यांना दिसणारे भ्रम ...
इथेच माणसं चुकतात... डोळ्यांना जो उठून दिसतो त्यालाच ते खरा रंग मानतात...

एखादा विशिष्ट रं* *ग अगदी उठून दिसत असला तर त्यात सगळ्यात जास्त श्रेय असतं
स्वतः पाठीमागे राहून त्या रंगाला उठाव देणाऱ्या त्या पृष्ठभागाच...
जसं पांढऱ्या खडूची अक्षरं काळ्या black-board वरंच आणि रंगीबेरंगी चित्र
पांढऱ्या canvas वरंच उठून दिसतात...

पण आजूबाजूच्या वातावरणापेक्षा त्या रंगाला एक विशिष्ट उठाव देणाऱ्या
पाठीमागच्या पृष्ठभागाकडे माणसं नेहमी दुर्लक्ष करतात...
तारीफ होते ती नेहमी स्पष्ट दिसणाऱ्या अक्षरांची किंवा मोहक वाटणाऱ्या रंगीत
चित्रांची... black-board आणि canvas ची नाही...

आयुष्यातही अशे अनेक प्रसंग येतात जेंव्हा आपली स्थिती त्या पाठीमागच्या
पृष्ठभागासारखी होते...
श्रेय मिळतं ते उठून दिसणाऱ्या रंगांना, बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींना...

अश्या वेळी आपण दुखी वाटून घेऊन नये...
सत्याकडे दुर्लक्ष्य करायची लोकांची नेहमीचीच सवय...
आपण फक्त, आपण मागे राहिल्यामुळे कुणीतरी 'दुसरं' उठून दिसतंय हा गोष्टीत
दिलासा मिळवावा...

ह्या दोन गोष्टी एकदा पचवल्या की मग black-board बनून राहण्यासारखी
मजा दुसऱ्या कशातच नाही...*
*
[image: Photo: लाल, हिरवा, निळा, पिवळा... अशे अनेक रंग... पण त्यातला खरा
रंग कुठला... खरं सांगायचं तर कुठलाच नाही... हे सगळे फक्त उघड्या डोळ्यांना
दिसणारे भ्रम ... इथेच माणसं चुकतात... डोळ्यांना जो उठून दिसतो त्यालाच ते
खरा रंग मानतात... एखादा विशिष्ट रंग अगदी उठून दिसत असला तर त्यात सगळ्यात
जास्त श्रेय असतं स्वतः पाठीमागे राहून त्या रंगाला उठाव देणाऱ्या त्या
पृष्ठभागाच... जसं पांढऱ्या खडूची अक्षरं काळ्या black-board वरंच आणि
रंगीबेरंगी चित्र पांढऱ्या canvas वरंच उठून दिसतात... पण आजूबाजूच्या
वातावरणापेक्षा त्या रंगाला एक विशिष्ट उठाव देणाऱ्या पाठीमागच्या
पृष्ठभागाकडे माणसं नेहमी दुर्लक्ष करतात... तारीफ होते ती नेहमी स्पष्ट
दिसणाऱ्या अक्षरांची किंवा मोहक वाटणाऱ्या रंगीत चित्रांची... black-board आणि
canvas ची नाही... आयुष्यातही अशे अनेक प्रसंग येतात जेंव्हा आपली स्थिती त्या
पाठीमागच्या पृष्ठभागासारखी होते... श्रेय मिळतं ते उठून दिसणाऱ्या रंगांना,
बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींना... अश्या वेळी आपण दुखी वाटून घेऊन नये...
सत्याकडे दुर्लक्ष्य करायची लोकांची नेहमीचीच सवय... आपण फक्त, आपण मागे
राहिल्यामुळे कुणीतरी 'दुसरं' उठून दिसतंय हा गोष्टीत दिलासा मिळवावा... ह्या
दोन गोष्टी एकदा पचवल्या की मग black-board बनून राहण्यासारखी मजा दुसऱ्या
कशातच नाही...]
*

Tuesday, May 29, 2012

ह्या मातीच ऋण फेडायचं... ह्या मातीच आपण काही देणं लागतो...

    ह्या मातीच ऋण फेडायचं... ह्या मातीच आपण काही देणं लागतो...
    ही असली वाक्य आपण ऐकलीच असतील...
    पण काही वर्षांपूर्वीच...

    आजकालच्या so called 'Modern' माणसाचा मातीशी संबंध राहिलाच कुठे आहे...
    मातीची घरं...
    अर्थातच... आजही काही गावात आहेत मातीची घरं... पण खूप मोजकीच...
    बाकी गावांच शहरीकरण झालं... अन मातीची जागा सिमेंट ने घेतली...
    अन Modernization च्या धुंदीत बेधुंद झालेल्या या शहरी माणसाला मातीची कधी
    'धूळ' झाली हे कळलंच नाही...
    मातीची धूळ झाली आणि धुळीची 'Allergy'... अन झाला माणूस मातीपासून दूर...

    ज्या घरात राहतात... त्या घरातली माणसं सुद्धा तशीच वागतात...
    जशी गरज तश्या आकारात घडण्याचा मातीचा गुणधर्म नकळतच मातीच्या घरात राहणाऱ्या
    माणसांत पण यायचा...
    ती माणसं मोकळ्या मनाने वागायची, समजून घ्यायची, मिळून-मिसळून राहायची...

    मग माणसांनी सिमेंट ची घरं बांधलीत अन त्यांची मनं त्यांनी त्यात कोंडून
    घेतली...
    आणि वरवरच्या रंगरंगोटी ने माखलेल्या या सिमेंट च्या घरातली माणुसकीच हरवली...

    सगळे जण आपले घराचे अन मनाचे दोन्ही दारं बंद करून मधे पडून असतात हल्ली !!!



    --


    *जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं,
    ते आपल्याला नको असतं, आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे
    आपल्याकडे असतं,
    ते आपल्याला आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो, याचंच नाव 'आयुष्य'
    असतं...!*

Monday, May 14, 2012

* आपल कोणीतरी असण्यापेक्षा *



आपल कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे असण्यात आनंद आहे
चार दिवास झिजण्यापेक्षा
एका दिवसाच्या जीवनचा अर्थ आहे
वादळातून चालण्यापेक्षा वादळात
मोहेन पडण्यात समर्पण आहे
कठावरून डोकावण्यापेक्षा
पुरामध्ये झोकून देण्यात जीवन् आहे
कोणी आपल्यासाठी झुरण्यापेक्षा
आपण कुणासठीतरी झुरण्यात प्रीत आहे,
आपल कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचेतरी असण्यात आनंद आहे*

Saturday, May 12, 2012

*प्रवास जीवनाचा *

*प्रवास जीवनाचा *
एखाद्याची आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याची गती 'संथ' असली म्हणून त्याला
नाकर्ता ठरवणं हे कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
झटपट शिखर गाठण्याच्या नादात बेधुंद होऊन प्रवास करणारे कदाचित पेहले शिखरावर
पोहोचतीलही...
पण जेंव्हा वाटेत अडथळा येतो तेंव्हा गती जितकी जास्त तितक्या जोरात अपघात
होतो...
अपघात जेवढा मोठा जखमाही तितक्याच गंभीर...
अन गंभीर जखमा भरायला वेळही खूप जास्त लागतो...

याउलट जे संथ पण खंबीर पणे प्रवास करत असतात त्यांच्या वाटेत अडथळा आला तरी
त्यांना फक्त ठेच लागते...
ती माणसं सहसा पडत नाहीत... अशी ठेच जखम करत नाही असं नाही... पण ती फक्त
तात्पुरती जखम..
एकदा का ती जखम भरली की ते परत पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतात...
एकदा ठेच नक्की कुठे लागतेय हे कळालं की मग माणूस पुढच्या वेळी जरा जास्त सावध
राहतो ..
अशी माणसं मग जास्त लांब प्रवास करतात..

तसंपण सस्याच्या अन कासवाच्या शर्यतीत शेवटी विजय कोणाचा होतो हे सगळ्यांना
चांगलच ठाऊक आहे !!!!

माणसांच आयुष्यं हे त्या दिव्यासारखं असतं...

दुसऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊन जगणाऱ्या
माणसांच आयुष्यं हे त्या दिव्यासारखं असतं...
एखाद्याच्या आयुष्यात अंधार पडला की मग त्यांना दिव्याची आठवण येते...
दिव्याच सामर्थ्य हेच... तो स्वतः जळत राहतो पण परिसरातला अंधार नाहीसा करून
तिथे रोषणाई करतो...

अन असं नाही की त्याला जळत राहायला त्रास होतो...
त्यात जोपर्यंत प्रेमाचं, किंमतीच, विश्वासाचं तेल ओतलं जातं तोपर्यंत तो दिवा
अगदी स्वखुशीनं जळत राहतो...
त्याला बस तेवढंच हवं असतं...

पण शेवटी माणसं ही... अंधारात त्यांचे चेहरे दिसत नाहीत...
अन जेंव्हा त्या अंधाऱ्या रात्रीची पहाट होते तेंव्हा त्या उजेडात त्यांचे खरे
चेहरे समोर येतात...
तेंव्हा त्यांची "गरज" संपलेली असते... अश्या वेळी मग ते हमखास दिवा विझवतात...
मग विझवलेल्या दिव्याच्या आयुष्यात भर दिवसा "अंधार" पडतो...

विझलेले दिवे कोणाच्याच आयुष्यातला अंधार दूर करू शकत नाहीत...

"स्वतःच्या सुद्धा नाही" !!!!
 

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....



आधी विचार करा, मग कृती करा.

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

*स्त्री ...''

*स्त्री ...''
.
सख्यांच्या सहवासात रमनारी ती एक
'मैत्रिण' असते......
तो आपल्याशिच लग्न करेल ना? अशी हुरहुर
वाटानारी ती एक 'प्रेयसी' असते.........
नवार्याची घरी यायची नेहेमीची वेळ
गेली की काळजी करणारी ती एक 'बायको'
असते....
मुलाना उशीर झाला की व्याकुलतेने वाट
पाहनरी ती एक 'आई' असते.........
बाबांचा राग झेलनारी ती एक 'मुलगी'
असते......
भाऊबिजेला भावाकडून भेट मिलाल्यावर
आनंद होनारी ती एक 'बहिन' असते............
आयुष्यात अशी नाती जपनारी ती एक
शेवटी एकटीच असते........!!!*

मी असाच आहे


मी असाच आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरणारा.....

मी असाच आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा......

मी असाच आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा.....

मी असाच आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसता
नियतीला लाजवणारा....

मी असाच आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आठणारा.....

मी असाच आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
**घर एक करुन राहणारा...*

लढ रे मना हिम्मत तु साठवून...

लढ रे मना हिम्मत तु साठवून...


नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना हिम्मत तु साठवून

जाईल हे ही वादळ थोडा वेळ घोघालुन
तगायचय तुला आपल्यांना आठवून

लक्ष्यात ठेव प्रत्येक वादळlला शेवट हा असेलच
घाबरला आहेस तरी निट बघ मार्ग तुला दिसेलच

नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना हिम्मत तु साठवून

माहित आहे दुबळl आहेस तु टिकायला
काहीच नाही आहे तुझ्याकडे लढायला

तरी ही ललकारया देत रहा ओरडून ओरडून
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून
लक्ष्यात ठेव वादळच खुप काहि शिकवितात

प्रत्येक वेळी ते तुमच आयुष्यच बद्लवितात
उपयोग कर त्यांचा स्वताला तपासायला

काय आहोत आपण? आणि काय होवू शकतो हे जनायला
नको हाथ पाय गालु रूप त्याचे पाहून

स्वार हो त्यावर लढायचे ठरवून
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून

लढ रे मना हिम्मत तु साठवून

 

Monday, May 7, 2012

" : आळशी माणसं खुप हुशार असतात :".

" : आळशी माणसं खुप हुशार असतात :". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया
ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो."
आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास
आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक
आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक,
म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा
आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार
कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी
लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची
व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक
गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता
हार घातला की काम झालं. ;D

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात,
उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन
जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता
आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते.
बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम
करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन
परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना
पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही -
प्रत्यक्ष पाहिलं आहे. ;D

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत.
महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो.
बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत
घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत.
सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला
गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत
म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे
शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत.
त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा
लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच
नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर. :D :D :D

ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची
सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते.
आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं
मला
मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत
बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर
माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत
असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर
त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं
म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन
सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच
नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस
किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं
आहे की नाही? :-[
मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत
बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर
माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत
असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर
त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं
म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन
सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच
नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस
किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं
आहे की नाही? :

चुकांपासुन धडा घ्या आणि पुढे चला !

चुकांपासुन धडा घ्या आणि पुढे चला !
learn mistakes anger management life balance personality developement


“To err is human” अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे याचा अर्थ “माणसाकडून चुका
होतातच”. ऑफिसमध्ये, घरी, मित्रांसोबत, समारंभात कधीतरी कुठेतरी आपण चुकत
असतोच.आपल्याला आपली चुक कळते, त्यानंतर थोडी अपराधीपणाचे भावनाही मनात सलू
लागते.
मनावर संयम हवा, जिव्हानियंत्रण असावे, राग आटोक्यात असावा इत्यादी बरेच सल्ले
चुका होउ नये म्हणुन देण्यात येतात. पण तरी सुध्दा आपण चुकतोच. घाबरु नका, मी
काही तुम्हाला असे उपदेशाचे डोस देणार नाही आहे. तर आज आपण बोलु यात चुक
झाल्यानंतर (होय झाल्यानंतर , केल्यानंतर नव्हे!) ती चुक सुधारण्यासाठी कसे
वागावे आणि होणारा मनस्ताप कस टाळता येइल याबद्दल.

चुक सुधारण्याची सुरुवात होते चुक झाली आहे हे मान्य करण्यापासून.
तिर्‍हाइताच्या नजरेने आधी आपले वागणे तपासून पहा. चूक लक्षात येइलच (अर्थात
असल्यास!)

– आपल्या भावनांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा. केलेल्या चुकीमुळे मन अस्थीर होउ
देउ नका. एक मोठा श्वास घ्या आणि हळु हळु सोडा. मनाला थोडे ताजे करा.

– चुक घडुन गेल्यानंतर लगेचच त्याचा विचार करु नका. अथवा प्रतीक्रिया देउ नका.
थोडा वेळ घ्या (२-३ तास) आणि तोपर्यंत दुसर्‍या एखाद्या गोष्टीत लक्ष गुंतवा.

– एकदा तुम्ही फ्रेश झालात की मग झालेल्या चुकीचा विचार करा. “4 Q” थीअरीचा
वापर करा. म्हणजेच ( Why) असे का घडले?, (which) कशामुळे घडले?, (How) जे झाले
ते कसे सावरता येइल? (who) झाल्या प्रकारामुळे कोण कोण दुखावले गेले आहेत? हे
चार प्रश्न स्वतःला विचारुन त्यांची उत्तरे शोधा.

– झाला प्रकार सावरण्यासाठी काही करता येइल का ते पहा. जर काही करता येण्याची
अंधुकशी देखिल शक्यता असेल तर जरुर करा.

– आणि अगदिच काही करण्यासारखे नसेल तर पुन्हा अशी चुक करणार नाही हे मनाशी
पक्के ठरवा.
– झाल्या चुकीचा परीणाम सध्या हाती असलेल्या कामांवर होउ देउ नका. त्यामुळे
जास्त चुका होण्याचा संभव असतो.

– पश्चाताप करुन काहीच हाती लागत नाही. आणि चिंता करुन झाले तर नुकसानच होते.
म्हणुन हे दोन्ही टाळा.

– Sorry म्हणा. होय हा सगळ्यात सोपा उपाय आहे. बर्‍याच लोकांना सॉरी (Sorry)
म्हणणे कमीपणाचे वाटते. पण तसे काही नसते. आपली चुक असल्यास सॉरी म्हणण्यास
काहीच हरकत नाही.

– पण फक्त नावापुरता सॉरी म्हणुन उपयोग नाही. “Saying sorry will not help,
you should feel sorry” मनापासुन खंत वाटली पाहीजे आणि मनापासुन माफी मागीतली
पाहीजे.

– कधीही आपल्या वागण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली असल्यास क्षणभर ती व्यक्ती
महत्त्वाची आहे की ज्या गोष्टीशी संबंधीत चुक याचा विचार करा. उत्तर तुम्हाला
आपोआप मिळेल.

– शहाणा आणि मुर्ख माणसात अथवा यशस्वी आणि अपयशी माणसात एक फरक असतो. शाहाणा
माणुस झालेल्या चुकांमधुन धडा घेतो आणि पुढे जातो. मुर्ख माणुस एकदा केलेल्या
चुकांमधुन काहीच न शिकता त्याच चुका वारंवार करत राह्तो.

*आईची ममता , वडिलांचे प्रेम *

*आईची ममता , वडिलांचे प्रेम *
बहिणीची माया, वृक्षाची छाया
इकडून तिकडून सारखीच ...!

सुखाची चाहूल, दुखाचे सावट
दिवसाचा आयाम अन रात्रीचा आराम
इकडून तिकडून सारखाच ...!

मौनाची भाषा, भाषेचे मौन
जाणिवेच भान अन भानामधली जाणीव
इकडून तिकडून सारखीच ...!

दगडातला देव, प्रार्थनेचे पेव
हार, तुरे , नैवेद्य प्रसाद अन पुढचे निर्माल्य
इकडून तिकडून सारखेच ...!

हसणारे चेहरे, चेहर्यांवरच हास्य
चौपाटीवरची भेळ अन उंदरा-मांजरांचा खेळ
इकडून तिकडून सारखाच ...!

गवताची हिरवी पाती, निधडी कडवी छाती
ओली सुपीक माती अन घट्ट गुंतलेली नाती
इकडून तिकडून सारखीच ...!

सांताचा पाठलाग अनंताचा मागोवा
भक्तीचा ओलावा अन अंताचा सुगावा
इकडून तिकडून सारखाच....

Thursday, May 3, 2012

आभाळात उडणारा पक्षी.....


आभाळात उडणारा पक्षी,
किती बेधुन्द होऊन उडतो...
पंखांच्या बाळा वर,
वार्य़ाशी तो लाडतो...
कस ही आसला आभाळ,
तो मात्र उडत्च राहतो..
आभाळात त्या,
आपले जाग तो शोधू पाहतो...
मला ही आज त्या पक्षा सारखा उडयेचे आहे,
पंखांच्या बळावर,
वार्य़ाशी लाडयचे आहे...
कस ही असला आभाळ,
मला मात्र उडत्च राहीचे आहे..
आभाळात त्या आपले जाग शोधायेचे आहे.....

!! निर्णय !!

!! निर्णय !!

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता ..
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते ..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते ..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव " म्हणजे काय हे तेव्हाच कळते ...!!
जेव्हा एखादी "ठेच " काळजाला लागते ....!

शब्द...आणि....स्पर्श....


*शब्द...
शब्दांची जुळवाजुळव करता आली की माणसाला भाषा येऊ लागते...
पण फक्त शब्दांची भाषा यायला लागली की आपल्याला "संवाद" जमायला लागलाय या
भ्रमात माणसं जगत असतात...

आयुष्यातल्या काही अनमोल क्षणांमध्ये शाब्दिक संवाद काम करत नाही... तिथे शब्द
द* *ुय्यम पडतात...
अश्या क्षणांमध्ये भावनिक संवाद होतो... आणि भावनिक संवादाची एकमेव भाषा
म्हणजे,

"स्पर्श"....

जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही...
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते...


लहानपणी आईच्या कुशीत झोपलेले असतांना तिने मायेने डोक्यावरून फिरवलेला हाथ...
पहिला नंबर आल्यावर बाबांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप...
आजीच्या सुरकुत्यांशी खेळतांना वाटणारी मजा...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ...
अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून
देणारी तिची मिठी...

ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त
स्पर्शाचीच भाषा लागते...

शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात...*

'माणूस'

*मला ना या 'माणूस' नावाच्या प्राण्याचं कोडं काही केल्या सुटत नाही...
का इतकं विचित्र वागतो तो...

त्याला दगडात देव दिसतो...* *
मग माणसातला 'माणूस' का नाही दिसत...

* * असं म्हणतात देवाने सृष्टी निर्माण केली अन माणूस पण...
पण हे किती अंशी खरं आहे यावर मला खूप शंका आहे... आणि ती या माणसामुळेच...

कुठल्या दगडात देव आहे हे ठरवणारा कोण.. तर माणूस...* *
कोणाचा देव कुठला, कोणत्या देवाचा कोणता रंग हे ठरवणारा कोण... माणूस...
कोणत्या देवाची पूजा करायची, कोणत्या देवासमोर मेणबत्ती लावायची, कोणाला
जाळायचं कोणाला दफन करायचं हे ठरवणार माणूस...
अहो हे तर सोडा चक्क वार पण वाटून टाकलेत माणसांनी देवांसाठी... अमुक एक वारी
हा देव अन अमुक एक वारी तो देव... त्यातपण भारतातले अर्धे अधिक देव तर Waiting
list मधे आहेत... देवच इतके आहेत करणार काय...
भक्ती आणि माणुसकी यांचा अर्थ कळतोय कोणाला इथे...
देवाची आठवण पण कधी येते आपल्याला.. परीक्षेत पास होण्यासाठी, नौकरीत
बढतीसाठी, चांगलं नवरा मिळण्यासाठी... म्हणजे जेंव्हा काही 'हवं असतं'
तेंव्हाच...
बरं त्यात पण पास झालो तर ते "आपल्या मेहनतीमुळे".. अन नापास झालो की सगळं
खापर देवावर फोडायचं.. काय चुकलं माझं... दर शनिवारी दिवा लावायचो..

देव सगळ्यांवर सारखाच प्रेम करतो हो... त्याला रंगात, जातीत भेद करता येत
नाहीत.. कारण निर्माण करतांना त्याने फक्त माणूस निर्माण केला होता... अन
माणुसकी हा एकच धर्म ही ...* *
रंग, जात, पात हे सगळे भेद निर्माण करणारा माणूस...

Wednesday, May 2, 2012

जाणे कुठे हरवले ते दिवस...

*जाणे कुठे हरवले ते दिवस...
फुटलेल्या घोट्यांचे...
अन तुटलेल्या झोक्यांचे...

किती धडपडायचो तेंव्हा... काही गणितच नाही...* *
तेंव्हापण सोलायचेच ना कोपरे अन गुढगे...
थोडावेळ दुखायचे सुद्धा ..
घळाघळा वाहायचे अश्रू...
पण तितक्याच लवकर वाळून पण जायचे...
परत खेळायला लागलो ना की ते दुखणं कुठल्या कुठे पळून जायचे...

कारण तेंव्हा कारणे शोधा?? हा प्रश्न फक्त एकदाच, म्हणजे, वार्षिक परीक्षेतच
यायचा...
तसंपण तेंव्हा आपल्याकडे पाटी अन पेन्सील असायची...
जे वाटेल ते काढायचं... आवडलं तर परत परत तेच गिरवायच...
अन नाही आवडलं तर सरळ सरळ पुसून टाकायचं...


मग आपण मोठे झालो... आणि सगळी सोय गेली...
व्यावहारिक जगात अन स्वार्थी माणसांत "टिकून राहणं" म्हणजे रोजच एक नवी
परीक्षा...
त्या परीक्षेतल्या प्रश्नांची कारणं शोधता शोधता मग सगळी निरागसता हरवते...

न असलेली दुखणी पण मग अश्यावेळी खूप दुखायला लागतात...
कारण परत खेळ सुरु करायची आपल्या मनाची मुळीच इच्छा नसते...
त्यामुळे ते त्या नसलेल्या दुखण्यातच पळवाट शोधत फिरते...
अश्यावेळी मग अश्रू पण दगा देतात... मुक्तपणे गालावरून ओघळत नाहीत ते...
फक्त पापण्या ओल्या करून जातात...
ओल्या पापण्या सहसा कोणाला दिसत नाहीत... त्या बघायला अंतरंगाचे सूर जुळावे
लागतात... अन अशी माणसं खूप कमी भेटतात...

मोठेपणी आपली पाटी-पेन्सील हरवते...
आणि त्याची जागा घेते "Permanent Marker" ...
म्हणजे "पुसून टाकायची" सोय रहात नाही...
एकदा जे गिरवलं ते पुसता येत नाही...
त्याचे "Marks" फक्त आयुष्यभर आपल्या सोबत राहतात...

लहानपणीच्या जखमा शरीरावरचे सालटे काढतात...
अन मोठेपणीच्या..... मनावरचे !!!!*

Monday, April 30, 2012

स्वतःला जाणून घ्या


[शरीर आणि मन ]

कुठल्याही कामासाठी पुढचे पाऊल उचलण्या आधी आपण स्वतःला जाणून घ्यायला
हवे . कारण खूप वेळा असे होते कि आपली इच्छा काही तरी वेगळेच करायची असते
, पण आपल्या शरीराची ती कुवत नसते . अशावेळी एकतर आपल्या जवळ खूप जबरदस्त
इच्छा शक्ती असायला हवी किंवा आपण आपले मन अशा कामात गुंतवायला हवे जिथे
आपली शारीरिक कुवत कमी पडणार नाही . मी लोकांना खुपदा म्हणतांना बघितले
आहे ,'' मी माझ्या स्वतःला खूप चांगल्याने जाणतो . तुम्ही कोण मला
माझ्याविषयी ज्ञान देणारे ?'' माझा त्यांना एकच सवाल आहे ,
'' एवढ्या चांगल्या रीतीने स्वतःला जाणता , मग स्वतःला झेपत नाहीत ती
कामं करून स्वतःचेच हसू का उडवण्याची इतरांना संधी का देता ?''
कसे ? एका उदाहरणाने समजावते , एक एकवीस वर्षांची मुलगी आहे . तिचा हट्ट
आहे विश्व सुंदरी बनण्याचा . पण तिची उंची फक्त पाच फुट आहे आणि इथे तर
प्रवेश पात्रतेत पाच फुट पाच इंच एवढी उंची हवी आहे . असे असतांना तिचा
हट्ट हा मूर्खपणाच समजावा लागेल कि नाही ? तिचे स्वतःच्या शरीराला ,
उंचीला दोष देणे अयोग्यच म्हणावे लागेल ना ?
हे झाले शारीरिक कुवतीचे . आता मानसिक कुवत बघू . म्हणजे आपले मन ! जे
मनाने कच्चे असतील , खूप भावूक असतील त्यांना मी एकाच सल्ला देईल , तो
असा कि त्यांनी चुकूनही वकील , डॉक्टर किंवा पोलीस बनू नये . अन
राजकारणाचा तर विचारही करू नये . कारण हि चार हि क्षेत्र अशी आहेत कि इथे
तुमचे मन खंबीर असणे खूप गरजेचे आहे . नाहीतर तुमचा या क्षेत्रात टिकाव
लागणार नाही . आणि तुम्ही स्वतःच , स्वतःच्या असफलतेचे कारण व्हाल .
तेव्हा आपण शरीराने तसेच मनाने काय आहोत ? आपल्याला काय झेपेल आणि आपण
कोणते कार्य अगदी चोखपणे पूर्ण करू शकू ? ह्याचा अभ्यास करून , मगच योग्य
तो निर्णय घ्यावा . प्रत्येक दिवशी , प्रत्येक क्षणी , प्रत्येक कार्य
करतांना स्वतःला विचारावे ,' मी काय आहे ? मी हे कार्य करण्याच्या योग्य
आहे ना ? मला हे झेपेल ना ?' स्वतःचा , आपल्यातील स्व चा अभ्यास करायची
सवय करा . म्हणजे तुम्हाला नक्की कशाची गरज आहे ह्याची प्रचीती तुम्हाला
येईल .
शारीरिक आणि मानसिक फरक - आपले शरीर हे आपले सर्वांना दिसणारे , दृश्य
असे बाह्य रूप आहे , तर आपले मन हे आपले अदृश्य असे आंतर रूप आहे . शरीर
आपली शारीरिक , म्हणजे दृश्य स्वरूपातील कुवत ठरवते . तर त्याच वेळी मन
आपली मानसिक , म्हणजे अदृश्य स्वरूपातील क्षमता ठरवते . शेवटी तुमच्या
सर्व शारीरिक कृती ह्या तुमच्या मानसिकतेतूनच जन्मलेल्या असतात .
अशाप्रकारे एकदा का तुम्ही तुमच्या स्वतःला समजून घेतले तर तुम्हाला फक्त
तुमच्या शारीरिक हजेरीचेच ज्ञान होणार नाही , तर तुमच्या मनाबद्दल सुद्धा
तुम्ही जागृत राहाल . तुमचे मन काय विचार करतेय ? त्याची भावूकतेची पातळी
काय आहे ? तुमचे मनाचा कल कुठे आहे ? ह्याची माहिती आपल्याला आपोआप होईल
.
 

Tuesday, April 24, 2012

इंग्रजीतून मराठी

इंटरनेटचा मामला म्हणजे इंग्रजी भाषा गरजेची. आपल्याला ती काही जमत नाही
म्हणजे इंटरनेट..इ-मेल हा आपला प्रांत नव्हे; असं मानून मागे का राहायचं?
इंटरनेटवर असे पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही नुसता इ-मेल नव्हे, तर एक
अख्खा लेख मराठीत टाइप करू शकता.
इंटरनेट वापरातला सगळ्यात कटकटीचा विषय असतो तो म्हणजे इंग्रजी. म्हणजे
होतं काय की आपल्याला इंग्रजी येत नसतं, असं काही नाही. आपल्याला इंग्रजी
चित्रपट कळतात. बातम्या कळतात. वेळप्रसंगी आपण गरजेपुरतं बोलूही शकतो; पण
इंग्रजीत लिहिण्याची आपल्याला सवय असतेच असं नाही. आता माझ्या आईचंच बघा
ना, तिला इंग्रजी येतं अगदी व्यवस्थित, पण या विलायती भाषेबद्दल ती नको
इतकी कॉन्शस आहे. म्हणजे येत असूनही अनेकदा निव्वळ त्या भाषेच्या अनामिक
भीतीमुळे ती चुका करते.
मला ना माझ्या शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे, मी ना हमखास गणिताच्या पेपरात
चुका करायचे.
आणि त्या चुका कशा असायच्या माहिते?
मला प्रश्नच दिसायचे नाहीत किंवा सगळा प्रश्न सोडवल्यावर उत्तर लिहायचीच
मी विसरून जायचे. किंवा भूमितीतलं एखादं प्रमेय येत असूनही आयत्यावेळी
काहीतरी घोळ घालायचे. त्यामुळे ते चुकायचं..आता जेव्हा मी विचार करते की
असं का व्हायचं, तर मला वाटतं ते माझ्या मनातल्या गणिताच्या भीतीमुळे
व्हायचं. सगळं येत असूनही आपल्याला येणारच नाही किंवा आपण जे काही लिहू
ते चुकेलच या भीतीतून मला जे यायचं त्यातही मी चुका करायचे.
माझ्या आईचं किंवा तुमच्यापैकी अनेकींचंही असंच काहीतरी होत असणार.
इंग्रजीची भीती उगीचच असते मनात. ती कमी करायचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण
त्याचबरोबर आता इंटरनेटवर तुम्ही आरामात मराठीत लिहू शकता. मराठीतून
लिहिण्याची सुरुवात आपण इ-मेलपासून करूयात. ‘जी-मेल’ आणि
‘रेडिफ-मेल’सारख्या किंवा इतरही अनेक इ-मेल सेवा देणार्‍या कंपन्यांनी
त्यांच्या सेवांमध्ये आता मराठीतून लिहिण्याची सोय उपलब्ध करून दिलेली
आहे. उदाहरणाखातर आपण ‘जी-मेल’द्वारे मराठीतून मेल पाठवायची कशी ते
बघूयात.
‘जी-मेल‘च्या तुमच्या अकाउंटला तुम्ही लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला
सगळ्यात पहिले तुम्हाला एक लिंक दिसेल, कम्पोज मेल. या बटणावर क्लिक केलं
की जी मेल लिहायची आहे त्यासाठीचा कोरा कागद किंवा रिकामी जागा समोर
येईल. तुमच्या समोरच्या विन्डोमध्ये, टू, सीसी, बीसीसी, सब्जेक्ट असे
ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. त्याखाली काही चिन्ह दिसतील. त्यात अ हे चिन्ह
असेल. त्यावर क्लिक करायचं. म्हणजे मराठीतून लिहिण्यासाठी तुम्ही सज्ज
होता.
आता प्रत्यक्ष लिहायचं कसं? ते तर अगदीच सोपं आहे. आपण रोमन मराठीत
लिहितो. उदा. चरश पर्रीं ीरीळज्ञरर. मराठी शब्द लिहिताना अक्षरं मात्र
इंग्रजी वापरायची. याला म्हणतात ‘फोनेटिक’ लिपी. तर अ वर क्लिक
केल्यानंतर खालच्या मोकळ्या जागेत तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते मराठी
शब्द इंग्रजी अक्षरं वापरून लिहायचे.
प्रत्येक शब्द लिहून झाला की स्पेसचं बटण दाबा. ते दाबल्याबरोबर तुमच्या
समोरची इंग्रजी अक्षरं जाऊन मराठी शब्द उमटेल. अशा प्रकारे तुम्ही
तुम्हाला जे काही पत्र लिहायचं असेल ते संपूर्ण पत्र इंग्रजीत लिहू शकता.
यात काही वेळा निराळंच अक्षर किंवा अशुद्ध अक्षर उमटलं तर पुढे न जाता
की-बोर्डवरचं बॅकस्पेसचं बटण दाबायचं की तुम्हाला काही पर्यायी शब्द
विचारले जातील. त्यातला जो योग्य शब्द असेल त्याची निवड करायची. अशा
प्रकारे तुम्ही कितीही मोठं पत्र, लेख जी-मेलच्या माध्यमातून लिहू शकता.
या फोनेटिक लिपीचा फॉण्ट असतो युनिकोड. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मराठी
मजकूर तुम्ही ज्यांना कुणाला पाठवणार आहात ते तो सहजपणे वाचू शकतात.
आता तुमचा मजकूर लिहून झाल्यावर, टू मध्ये ज्यांना इ-मेल पाठवायची आहे
त्यांचा इ-मेल आयडी टाका, एकापेक्षा जास्त लोकांना तीच इ-मेल पाठवायची
असेल तर इतरांचे इ-मेल आयडीज् सीसी मध्ये टाका. आणि अजूनही कुणाला
पाठवायची असेल पण इतरांना ते समजू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर त्या
व्यक्तींचे इ-मेल आयडीच बीसीसी मध्ये टाका. ज्या विषयावरचं पत्र असेल तो
विषय सब्जेक्ट मध्ये लिहा. आणि इ-मेल सेंड करा. तुम्ही टाकलेल्या इ-मेल
आयडीवर मेल गेली की युवर मेल हॅज बिन सेंट, असा संदेश तुमच्या स्क्रीनवर
तुम्हाला वाचायला मिळेल.
इंटरनेट ही तशी सोपी भानगड असते. तुम्ही तुमच्या इ-मेल अकाउंटला गेला की,
तिथे असणार्‍या वेगवेगळ्या लिंक्स उघडून बघा. वापरून बघा. त्यातून तुम्ही
आपोआप असंख्य गोष्टी शिकाल. लहान मुलाला कसं एखादं नवं खेळणं आणून दिलं
की तो ते उघडतो. आपल्याला म्हणजे मोठय़ांना वाटतं, पोरानं खेळणं तोडलं,
पण खरं तर तो त्याची उत्सुकता शमवण्याचा प्रयत्न करत असतो. इंटरनेटच्या
बाबतीत आपलं वय कितीही असलं तरी नवं खेळणं मिळालेल्या लहान मुलाप्रमाणे
आपण वागलं पाहिजे. न घाबरता बिनधास्त ते वापरायला शिकलंच पाहिजे.

जे नाहीयेय आणि ते हवंय त्याला 'अपेक्षा' म्हणतात.....
जे हवंय आणि नाही मिळतंय त्याला 'उपेक्षा' म्हणतात.....
मग जे आधीपासून जवळ आहे ते काय आहे?......'निरर्थक'?????....
जे नाहीयेय ते मिळाले नाही कि दु:ख करत बसताना खरी उपेक्षा कोणाची होते?
ज्याला काही मिळाले नाही त्याची.....?
... कि जे आधीच मिळालेय आणि दुर्लक्षित केलं जातंय त्याची??????
आपण कुणाच्या तरी आयुष्यात असूनही समोरच्याच्या नजरेतला शोध नाही थांबला
कि 'अवहेलना' आणि 'तूच्छ' या शब्दांचा खरा अर्थ कळतो आणि अनुभव येतो....
आणि सगळ्याच जखमांना औषध नसतं....अवहेलनेला तर नाहीच नाही.....
त्याहून मोठी गळचेपी अशी कि.....अपेक्षांना अंत नसतो....
आयुष्याच्या बाबतीत "१००%" हि संख्या काल्पनिक आहे...

Saturday, April 21, 2012

या जगाची रीतच निराळी आहे...

पतंग जेंव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेंव्हा त्याचं सगळं श्रेय पतंगाची दोर
ज्याच्या हातात आहे त्यालाच जातं...
पतंग उडवणाऱ्याला पण ते श्रेय ढगात नेऊन पोहोचवत... त्यालापण खरतर तेच हवं
असतं...

पण त्या पतंगाला खरी भरारी देणारा तो वारा... त्याचं काय...!!!
तो यथेच्छ दुर्लक्षिला जातो... कारण तो वारा कुठलाही जाब विचारत नाही की
कुठलीही बढाई मारत नाही...
तो अगदी मुकाट्याने आपलं काम करतो... तो पतंगाला तर आकाशात उंच भरारी घेऊन
देतोच पण पतंग उडवणाऱ्याला सुद्धा पतंग 'आपल्या' कौशल्या मुळे उडतोय हा भाबडा
भास ही देऊन जातो... तेच त्या वाऱ्याच खरं सामर्थ्य...

आयुष्यं पण तसं काही वेगळं नाही... इथे काही लोकं अशी भेटतात जी तुमच्या
सफलतेत फक्त दोरीला झटके मारायचं काम करतात, अन तुम्हाला सफलतेच्या शिखरावर
पोहोचवण्याच संपूर्ण श्रेय ते घेऊन जातात... अगदी काहीच न करता सुद्धा... कारण
त्या गगनभरारी मागे खरं कर्म असतं वाऱ्याएवढा अर्पनभाव असणाऱ्या काही
लोकांचं.. ही लोकं शांतपणे आपलं काम करतात... तुमचं सुखं कशात आहे हे ते
ओळखतात, अन मग तुमच्या नकळत, स्वतःवर दुखं ओढवूनही, ते तुम्हाला तुमची ती
गगनभरारी घ्यायला मदत करतात... पण त्या वाऱ्या सारखीच ही मंडळी सुद्धा यथेच्छ
दुर्लक्षिली जातात... कारण ती जाब मागत नाहीत... त्यांना श्रेय नको असतं...
त्यांना हवी असते तुमची ख़ुशी... त्यातच ते आनंद मानतात... पण अश्या लोकांना
ओळखण्यातच आपण बहुतेक वेळा चूक करतो...*

Friday, April 20, 2012

आयुष्य खूप सुंदर आहे,

*आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज
घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा......*

जिवनातले तीन छोटे नियम...


१ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही तर ते
तुम्हालाकधेचं मिळणार नाही.....!!!

२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर
त्याचे उत्तरनेहमीचं " नाही " असेचं असेल ......!!!

३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं
रहाणार.....!!!

खास माणसं

*जि माणसं आपल्या खांद्यावर हात टाकतात;*

*अन आपल्या बेसावध क्षणी आपल्याला;*

*स्वतःचा खांदाच देऊन टाकतात;*

*अशी ही माणसं जरा खासच असतात.*

*अशी माणसं आयुष्यभर आपल्याला;*

*काही न काही देतच राहतात;*

*स्वतःची ओंजळ रिकामी झाली तरी;*

*जन्मभर पुरेल इतकं प्रेम मात्र देतात.*

*वेदना कुठे आपल्याला झाली तर;*

*अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात;*

*चुकलोच आयुष्याच्या वळणावर कधी;*

*तर आरशाप्रमाणे प्रामाणिक राहतात.*

*आयुष्यात कधी आलाच दाटून अंधार;*

*तर खास माणसांच्या पाऊलखुणा शोधायच्या;*

*आपण फक्त त्यावर आपली पावलं ठेवायची;*

*वाटा आपोआप सापडायच्या.*

*अशा या खास माणसासाठीचं फक्त;*

*आयुष्य पुन्हा जगावंस वाटत;*

*त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम;*

*मनाच्या कप्प्यात जपावंस वाटत.*

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

*जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..

*
*ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..

ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत

*
*नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..

ज्या वेळी माझे भाऊ थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला "एव्हरेस्ट" दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल
त्या "एव्हरेस्ट" च्या दिशेने टाकाचय..
तो " स्टार " मला गाठाचाय
मला "सत्यासाठी" झगडाचय संघर्ष कराचाय..

कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण "स्वर्गीय" असलं पाहिजे..*

Tuesday, April 17, 2012

आठवण

प्रत्येकाच्या मनात दडलेली अबोल भावना*
*आठवून देते कधी व्यक्ति,कधी जागा,*
*
कधी क्षण तर कधी आठवण
सोडून भान जागेच तोडून बंधन वेलेच,
ओलांडून सीमा जीवनाच्या
येते बरोबर ती आठवण
विनामुल्य मनाची साठवां म्हणजे आठवण
*

आई-बाप

*"आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं,
एडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलंस्वप्न पाहिलेलं
असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्यामरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्यखर्चलेल
असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणारस्टीअरींग असतं अचानक
आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम
हे; रोजच्याआयुष्यात, कामाला येणार बँकबॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या
वेळीमिळणारा, तुमचा बोनस किंवावेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत
जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस”
असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं शोधून काढलेले
व्हायरस संपवायचं, बाप हे"क्वारनटाईन" बटण असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं,
शिक्षणाचं विद्यापीठ असते बाप म्हणजे चालती बोलती,अनुभवाचीफॅकटरी असते आई
म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते बाप म्हणजे कर्म करून,
आयुष्यभरमिळवलेली कमाईअसते आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु
असतो दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचामित्र असतो आई म्हणजे साक्षात, भगवंत;
परमेश्वर असतो त्या परमेश्वरापर्यंत, पोचवणारा बापएक संत असतो आई म्हणजे;
तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मनअसतं बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा
आणिशरीरातलं हाड अन् हाड असतं कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आईगं SSS”
असतं आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बापरे बाप" असतं परमेश्वर समोर आला
तरी, उभे राहायलावीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं त्याच्या आई-बापाच्या रुपात,
विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म;
भगवंत हे सगळ, अजब गणित असतं त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हेकनेक्शन
असतं आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं उगाच नाही ते;
आपल्यासंस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृदेवो भव" म्हणलेलं असतं ...".*

Tuesday, April 10, 2012

हरवलेल्या संवेदना...


पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

Sunday, April 8, 2012

दोन मनांतील अंतर.....


एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, " आपण रागात असताना जोरात
ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?".
सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना
आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो."
यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती
समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य
असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी
विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र
कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच
उत्तर दीले. ते म्हणाले, " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या
असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन
काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा
अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच
उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील
अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद
इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत
नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय
म्हणायचे आहे ते ओळखतात.

(शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही
वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन
व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार
नाही.)
 

क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही


क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही आपले बोलणे व वर्तनामुळे कुणाची भावना
दुखावत असेल, तर त्याची जाणीव होताच क्षमा मागितली पाहिजे. तणाव दूर करण्याचा
हा हमखास उपाय आहे. वेळीच क्षमायाचना केली नाही, तर तणाव निर्माण होऊ शकतो.
संबंधांचे गणित असेच काम करते.

दोन व्यक्तींमध्ये वितुष्ट असेल तर त्यांच्यातील संवाद हाच वाद संपवण्याच्या
दिशेने सार्थक होऊ शकतो. उत्तम संवादाची सुरुवात आपल्या कृत्याबद्दल क्षमा
मागून केली जाऊ शकते. माफी मागून बोलणे यापेक्षा दुसरी चांगली पद्धत नाही.
मात्र, लोक माफी मागत नाहीत. ते आपली चूकच कबूल करत नाहीत.
...
आपण आपल्या चुकांतून बोध घेत पुढे जायला हवे. आपले जीवन व कार्याप्रती
उत्तरदायी असण्याची हीच एक चांगली पद्धत आहे. मात्र, या मार्गात ‘अहं’ हा
सर्वात अडथळा ठरतो, जो नेहमी आपण व आपल्या चूक स्वीकारण्यात आडवा येतो.
त्यामुळे आपण चूक आहोत, हे माहीत असूनही व्यक्ती ती कबूल करत नाही आणि माफीही
मागत नाही.

ज्याप्रकारे क्षमा मागणे कठीण वाटते, त्याचप्रमाणे क्षमा करणेही अवघड आहे.
अनेक इतक्या रागीट स्वभावाचे असतात की, एखाद्याची चूक झाल्यास ते त्याला
सहजासहजी माफ करण्यास तयार होत नाहीत. हेही चुकीचे आहे. माफी न मागणा-या व माफ
न करणा-या, दोन्ही -ºहेच्या व्यक्तींनी हे कधीही विसरू नये की, जीवनात कोणतीही
व्यक्ती चूक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यासाठी आपल्या चुकांतून बोध घ्यायला
हवा. असे न केल्यास तुम्ही आणखी एक संधी गमावत आहात. चुका व संभाव्य चुकीच्या
पावलांचे सतत मूल्यांकन करत राहावे. त्यातून काही शिकण्याच्या वा चुका पुन्हा
न होऊ देण्याच्या उत्तम व व्यवहार्य पद्धती सापडू शकतात.

- तात्पर्य क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही, उलट त्यातून नात्यांतील
दुरावा कमी होऊन जवळीक निर्माण होऊ शकते.
 
" ओठांवर हास्य, बगलेत सुरी, नजरेत आपलेपणा, काळजात विष, विंचवाच्या
नांगीत विष तर सापाच्या डोक्यात विष.......!!! जनावरांच्या बाबतीत पटकन
सांगता तरी येत.......!!! 'माणूस' हा एकच असा प्राणी आहे की त्याच 'विषाच
मर्मस्थान' सापडलेल नाही........"

कोटेबल कोट्‌स


-
*जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून
ठेवावेत. *
*- नारायण मूर्ती *

*यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.*
*- विश्‍वनाथन आनंद*
*
**नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *
*- धीरूभाई अंबानी *

*पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत
करतो. *
*- जे. आर. डी. टाटा *

*फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *
*- रघू राय *

*चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम
चांगला होतो.*
*- बिल गेट्‌स *

*मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण
तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
*- कल्पना चावला *

*कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा
भाग व्हा.*
*- बराक ओबामा *

*माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे
असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा
जरा जास्त होती इतकेच. *
*- आयझॅक न्यूटन *

*मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार
आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.*
-* सर्वपल्ली राधाकृष्ण*न

ऐकायला शिका...!!!



‘‘आपल्या आयुष्याची गाडी नेहमीच सरळ चालेल असं नाही. ती निरनिराळी
स्टेशन्स घेत, अनुभव घेत पुढे जाते. कधीतरी कुठेतरी तिचा अपघातही होतो.
नात्यांचंही असंच असतं. टप्याटप्यानं ते विकसित होतं. नात्याचा पाया बळकट
करण्यासाठी नात्यांवर विशेष मेहनत घ्यावी लागते. वेळ द्यावा लागतो.
नात्यांमध्ये वाद झाला तर एकमेकांचे नीट ऐकण्याइतपत मोकळेपणा आपल्याजवळ
असायला पाहिजे. तसं झालं नाही तर शब्दानं शब्द वाढत जातो. मग भांडणं,
आरोप करणं, खुलासे मागणं, एकमेकांवर टीका करणं या सगळ्या गोष्टी सुरू
होतात. तसं आपल्या नात्याचं होऊ द्यायचं नसेल तर दुसरा जे काही सांगतोय,
ते पटत नसलं तरी शांतपणे ऐकून घेऊन मग त्यावर प्रतिक्रिया देण्याचा
समजूतदारपणा दाखवायलाच हवा.’’
 

जीवन हरवले आहे

ए‌. सी. ऑफिस, स्वतंत्र केबीन
फटाकडी सेक्रेटरी, दिवसभर मिटिंग्जच मिटिंग्ज
मिटिंग्जमुळे खूप भेटी राहिल्या आहेत
सगळ्या मिटिंग्ज सोडून ज्याला भेटावं
असा लंगोटी यार मात्र हरवला आहे


भरपूर पगार, उदंड सेव्हिंग
मनसोक्त शॉपिंग, सामानाचा ढिगच ढिग
सामानाच्या ढिगाखाली खूप गोष्टी दडल्या आहेत
चूक करून ज्याच्या आड लपाव
असा आईचा पदर मात्र हरवला आहे
हरवला आहे

दिवसाआड पार्टी, कधी पब कधी डिस्क
धुंद रात्र मस्तीची ,प्याल्या प्याल्यातून झिंगच झिंग
चिअर्सच्या चित्कारात खूप आवाज विरून गेले आहेत
ज्या आवानानी हृदयाला साद घालावी
असा आरतीचा गजर मात्र हरवला आहे
हरवला आहे

कारच्या वेगात, सायकलची फेरी हरवली आहे
हॉटेलच्या खाण्यात, फोडणीची पोळी हरवली आहे
तारांकित क्रुझच्या आरामात, पंढरीची वारी हरवली आहे
पिकनिकच्या स्पॉटच्या गर्दीत, मामाचा गाव हरवला आहे
बंद दाराच्या अपार्टमेंटमध्ये, शेजार हरवला आहे
डीजे व्हिजेच्या गोंगाटात, वासुदेवाची मुरली हरवली आहे
साठ फुटी सिमेंटच्या रस्त्यात, वडाची सावली हरवली आहे
कॉन्व्हेंटच्या अट्टाहासात, बाराखडी हरवली आहे

हाय हॅलो थँक युमध्ये, साधीभोळी अनौपचारिकता हरवली आहे
फायद्यातोट्याच्या गणितात, उस्फुर्तता हरवली आहे
निलाजऱ्या रिमिक्समध्ये, निरागसता हरवली आहे
धकाधकीच्या दिनक्रमात, निवांत गप्पा हरवल्या आहेत
सिमेंटच्या जंगलात, माती हरवली आहे
चौकोनी कुटुंबात, नाती हरवली आहेत

आम्ही धावणार करिअरमागे, बाकी कशाची खंत नाही
कशाकशाचा हिशोब मांडू?

*ह्या चकचकीत मॉडर्न जगण्यात जिंदगीच हरवली आहे
जिंदगीच हरवली आहे *

Thursday, April 5, 2012

काही नाती

*जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....!!!"*

मैत्री हा असा एक धागा

*मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा लक्षात या गोष्टी.................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!*

Tuesday, April 3, 2012

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन
जातो, शिकवून जातो ...

जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो... तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन
जातो... ओल्या मातीचा गंध...* *
'देण्यात' किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो...

जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो... जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे... पण
तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो...
'ओझरता स्पर्श'... ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला ...
कारण त्यात 'लालसा' नसते... त्यात असते एक अनामिक 'ओढ'... अन तीच आपल्याला
टवटवीत ठेवते...
अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो... तेंव्हा ....
तेंव्हा राहतंच काय हो ;)...

तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो...
बेधुंद 'जगणं' काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो...*

*कधी असही जगाव लागत *

*कधी असही जगाव लागत *
*खोट्या हास्य्च्या पडद्याआड *
*खर दुख लपवावं लागत *
*
*
*कर्तव्याच्या नावाखाली *
*स्वताला राबवाव लागत *
*
*
*इतरांना आनंदी ठेवण्यासाठी *
*डोळ्यातलं पाणी लपवावं लागत *
*
*
*तीव्र इछ्या असून देखील *
*नाही म्हणव लागत *
*
*
*खूप प्रेम असून देखील *
*नाही असे दाखवाव लागत *
*
*
*अस इतरांना हसवता हसवता *
*कधी खूप रडव लागत *
*
*
*कधी असही जगाव लागत *

नशीब

*नशीब" कोणी दुसरं लिहित
नसतं,

आपल नशीब आपल्याच
हाती असतं,

येताना काही आणायच नसतं,
जाताना काही न्यायचं
नसतं,

मग हे "आयुष्य"
तरी कोणासाठी जगायचं
असतं,

याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी "जन्माला"
यायचं असतं....................!!!!!!!!!!!!!!!*

Monday, April 2, 2012

जगण्यासाठी अजुन काय हवं?

आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,

असे शब्द होते

*असे शब्द होते
तसे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा
तसे शब्द होते*

*कुणा ना कळावे
खरे काय होते
असे मुक्त वेडे
तुझे शब्द होते*

*श्रवून जाहले ते
लिहून घेतले ते
जपून ठेवले ते
खुळे शब्द होते*

*जगी जाणकार
कुणी ही असू दे
कविता म्हणाया
खुजे शब्द होते*

*प्रतिभेस माझे
साष्टांग नमन
समजलेच नाही
कसे शब्द होते*

*अनुवाद व्हावा
जरा इंग्रजीत
मराठीत बहुदा
न हे शब्द होते*

*ऐकता वाचता
जाहलो "आडवा"
तरीही उरावर
उभे शब्द होते..

बोट...

बोट...

ती जोपर्यंत जमिनीवर असते तोपर्यंत ती अशीच निश्चल पडून असते...
पण जेंव्हा ती पाण्यात उतरते तेंव्हा ती तरंगायला लागते...
हळूहळू का होईना पण प्रवाहाच्या दिशेने वाहायला लागते...

आयुष्यात पण आपल्याला दोन प्रकारची माणसं भेटतात...
पहिली त्या जमिनीसारखी असतात...
ती आपल्या आयुष्यात येतात... त्यांच्या सहवासात, दिवस, महिने, वर्ष सरत जातात
पण आपण जिथल्या तिथेच असतो..

अन दुसरे.. दुसरे त्या पाण्यासारखे असतात...
आपल्याला स्वतःच्या प्रवाहात वाहून घेणारे...
त्यांच्या सहवासात आपण डुलत राहतो, तरंगत राहतो...
एक वेगळीच आशा असते त्यांच्या सहवासात... कुठल्यातरी नवीन किनाऱ्यावर
पोहोचण्याची...

पण कधी कधी परिस्थिती आपली ताकद दाखवते...
वातावरण बदलते... एक भलं मोठं वादळ येतं... अन सगळं काही अस्ताव्यस्त होऊन
जातं...
अश्या वेळी दोनच गोष्टी होतात...
एक तर आपण पूर्णतः बुडून जातो...
आणि जर वाचलोच तर वादळी प्रवाह आपल्याला एखाद्या अज्ञात, अनोळखी बेटावर वाहून
नेतो...

"अन तिथून परत येणं हे जवळ जवळ अशक्यच असतं..."

गुरु

गुरु :
गु म्हणजे *गुप्त* आणि रु म्हणजे *रूप*.
*आत्म्याचे गुप्त रूप* साधकाला (भक्ताला) दाखवणारा, साधकाच्या अनुभवास आत्मरूप
आणून देणारा (*१*) तो गुरु.
आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवितो तो गुरु.
गुरुपद म्हणजे तत्पद. तत्पद म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चार
देहांच्या पलीकडे असणारे आत्मतत्त्व. तत्पद म्हणजे सत्पद. सत्पद म्हणजेच
चित्पद. म्हणून गुरु हे चैतन्यरूप आहेत व त्यांचे पदही चैतन्यरूप आहे. चैतन्य
हेच गुरूचे स्वरूप आहे. गुरु हे देहातीत व चैतन्यरूप असतात. निरुपाधिक जीवन
हेच त्यांचे खरे स्वरूप. गुरु हा सत्तारूप आहे. गुरु सोहंरूप आहेत. सोहंमधील
आकाश म्हणजे चिदाकाश. चिदाकाशात आत्मा तेजोरूपाने आहे; तेच गुरूचे खरे स्वरूप
आहे. तेथेच गुरूंचा वास असतो.

गुरुकृपा ही विषासारखी आहे. विष माणसाला आपणासारखे करून टाकते. कृपेने गुरु हे
शिष्याला आपणासारखे करून टाकतात.

गुरुकृपेशिवाय *आत्मसाक्षात्कार* होत नाही..

गुरुविण कोण दाखविल वाट ?

गुरुविण कोण दाखविल वाट ?
संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करू शकते. प्राप्त
जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग
गुरुच्या शोधास लागते.
एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत
गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ती जागृत होते. श्रद्धा बसते.
श्रद्धेमध्ये जबरदस्त शक्ती असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत
शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते.
गुरुपासून ज्ञानप्राप्ती करून घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत
होत. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदनुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत
जातो. शिष्याचे व्यक्तिमत्व बहरले जाते आणि मग नकळत जिज्ञासूंमध्ये चर्चा सुरू
होते की, श्री रामकृष्ण परमहंस मोठे की स्वामी विवेकानंद..................
जनार्दनस्वामी श्रेष्ठ की संत एकनाथ गुरु निवृत्तीनाथाची महती मोठी की संत
ज्ञानेश्वर माउलीची ?
खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आधी बी का आधी झाड... एवढे अवघड आहे. गुरु
आणि शिष्य यांचा मोठे पणा मोजायला कोणतेही व्यावहारिक परिमाण उपयोगी पडत नाही.
पण त्यातील महत्त्वाचा मुद्दा एकच गुरुशिवाय ध्येयवादी व्यक्तिमत्वाला पर्याय
नाही. मग असा गुरु भेटतो तेव्हा? कोठे? कसा? वगैरे वगैरे.
याचे उत्तर अगदी सोपे आहे. तुमच्या घरातही तुम्हांस आईच्या रूपाने, भाऊ अगर
वडिलांच्या ज्ञानाने, शिक्षकांच्या ममतेने गुरुछत्र लाभू शकते.
क्रीडांगणावरील अगर रंगभूमीवरील अनुभवी कलाकार, हेही त्या क्षेत्रातील गुरुच
होत. लो. टिळक, म. गांधी, स्वा. सावरकर हे आजच्या अनेक राजकीय पुढाऱ्यांचे
गुरुच होते. म्हणजे गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. तर
जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबंध असू शकतो.
यासाठी संवेदनाशील व्यक्तिमत्वाला जरुरी आहे मनोनिग्रहाची, श्रद्धेची आणि
भक्ती व प्रेमाची आवश्यकता आहे. चिकाटी व प्रामाणिकपणाची. या गुणांसह डोळस व
अभ्यासू दृष्टीने वाटचाल केल्यास योग्य गुरु लाभू शकेल. आणि मग ध्येयप्राप्ती
दृष्टिपथात येऊ शकेल. आज समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात र्कीर्तिशिखरावर
विराजमान झालेल्या व्यक्तीचा इतिहास पडताळून पाहता त्याच्या यशाचे रहस्य हे,
हे त्याच्या अचूक गुरुप्राप्तीत असल्याचे आढळून येईल. आणि म्हणूनच हे सत्य आहे
की ...........
गुरुविण कोण दाखविल वाट ?

आई, तू आहेस म्हणूनचं

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील
एक अंत आत ' म्हणजे एकांत..
आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो...
बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो
हे न पचणारे न पटणारे तथ्य...
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य
गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त
एकांत...

एकांत चांगला की वाईट?? यावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असु शकते... पण तो
सर्वांना हवा असतो हेही तितकेच खरे... कधी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,
त्रास देणारे क्षण विसरण्यासाठी...आयुष्यातली न सुटणारी कोडी
सोडवण्यासाठी...तर कधी सार्‍याचाच कंटाळा येऊन फक्त आणि फक्त एकट
राहण्यासाठी.. अश्या असंख्य कारणांसाठी प्रत्येकाला एकांत हवा असतो...भारताची
लोकसंख्या पाहिली तर अशी किती कारण असतील याचा विचार न केलेलाच बरा नाहीतर
त्यासाठी सुद्धा एकांत शोधावा लागेल...

जेव्हा कधी आपल्याला वाटेल की एखादी आपल्या जवळची व्यक्ती दु:खी आहे त्यावेळी
तिला एकटे राहू द्या... तो अनुभव त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो सांत्वन
करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थोडासा वेळ देणे जास्त योग्य... एकांत आणि
एकाकिपणा यात खूप फरक आहे... ’

आयुष्य जगताना खूप खाचखळगे होते, असणार आणि कायम राहणार...चालताचालता लागलं तर
कोणी चालणे सोडत नाही.... आयुष्यात जवळचे कोणी गेले तर कोणी जगणे सोडत नाही..
तसेच कोणी बरोबर असो वा नसो एकांत हा सुद्धा कोणीच सोडू शकत नाही...
 

Friday, March 30, 2012

नातं फुलणारं... डोलणारं... (मुक्तपीठ)


नाती क्षणोक्षणी साथ करत असतात... काही अल्पजीवी, तर काही चिरंतन... काही
प्रेमाची तर काही अशीच... ही नाती सांभाळायची असतात... कुरकूर व्हायला
लागली तर त्यांना स्नेहाचं वंगण घालावं लागतं... तुटेपर्यंत ताणायचं नाही
आणि अगदी सैलही सोडायचं नाही.. हे जमलं की नात्यांचा सुगंध आपलाच...

"प्रत्येक नात्याला एक वय असतं आणि प्रत्येक वयावर एक नातं असतं...'
वाक्‍य वाचलं आणि इतके विचार मनात आले, खरंच किती खरं आहे हे! प्रथम मनात
आलं नक्की नातं म्हणजे काय? रक्ताचं नातं, जोडलेले नातं, नाळेचं नातं!

आई-मुलाचं नातं जन्मायला आधी नाळ कापावी लागते. त्याआधी ती दोघे एकच
असतात. तिच्याच शरीराचा भाग जो आधी असतो त्याला वेगळे केले, स्वतंत्र
अस्तित्व दिले की "नातं' जन्माला येतं म्हणजे नात्यात एकरूपता, एकजीवता
असते, तर एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले असते आणि अशा दोन
स्वतंत्र बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे नाते. त्यात अलगता, वेगळेपणा असतो
तरीही एकमेकांना सांधणारा एक अदृश्‍य दुवा असतो. मग तो प्रेमाचा असेल,
समविचारांचा असेल, सहवेदनेचा असेल, सहकार्याचा असेल, कुठलाही असेल त्या
दुव्यालाच आपण नातं म्हणतो ते जन्माला येतं, अशाच एका क्षणी, की ज्यावर
खरं तर आपला कंट्रोल नसतो, जसं मूल जन्माला यावं तसं नातं जन्माला येतं
आणि अशाच एका क्षणी ते पंचत्वात विलीन होतं माणसाच्या मृत्यूसारखं...

फक्त त्या नात्याचं वाढणं, बहरणं, खुरटणं, अकस्मात संपणं, परत
पुनर्जन्मासारखे नव्याने जन्माला येणं आपण बघायचं असतं. काही नाती
अल्पायुषी ठरतात. काही दीर्घायुषी असतात. कित्येकदा त्या नात्याचं नुसतं
वयंच वाढतं. गुणात्मक मूल्य त्याचं काहीच नसतं. त्या उलट अल्पायुषी नातं
शतायुषी समाधान देऊन जातं.

कित्येकदा नातं जन्मापासूनच अशक्त असतं. थोडासा वातावरणात, परिस्थितीत
बदल झाला तरी ते आजारी पडतं. वाटतं, आता काय? पण समजुतीचे टॉनिक औषध
दिलं, की परत मूळ पदावर येतं. काही नाती मुळातच सशक्त असतात. कितीही वादळ
वारे आले, त्सुनामी आली, साथीचे रोग आले, तरी टक्कर द्यायची त्या नात्यात
हिंमत असते. काही नाती "हलकी' वजनरहित असतात. वारा ज्या दिशेने येईल
तिकडे वाहवत जातात, तर काही नात्यांना स्वतःचे "वजन' असते. कितीही
मतमतांतरे झाली, गैरसमजांची वावटळे उठली, तरी ते आपले स्थान सोडत नाही;
पण काही काही वेळेला नाती अपघातात सापडतात. ध्यानीमनी नसताना जरी
स्वतःच्या ड्रायव्हिंगची खात्री असली तरी वेगावर नियंत्रण राहत नाही,
विचार"चक्र' फुटते आणि गाडी भरकटते! कित्येकदा इतरांना ओव्हरटेक करण्याची
क्षमता आहे, असा अवाजवी विश्‍वास वाटतो; पण एका बेसावध क्षणी समोरून
येणाऱ्या परिस्थितीचा ट्रक आदळतो आणि नात्याला अपघात होतो. कधी तेथेच
प्राणज्योत मावळते, तर कधी ते "आयसीयू'मध्ये जातं...

हृदयाला झालेली जखम गंभीर असते. बराच वेळ लागतो परत नॉर्मल व्हायला आणि
नॉर्मलवर आले तरी कुठंतरी वेदनेचा व्रण राहतोच. परत थोडासा धक्‍का लागला
तरी ती वेदना बोलायला लागते, हुंदके देते, उसासे टाकते...

मला तरी वाटतं, नात्यानं जन्म घेतल्यावर ते चिरतरुण राहण्यासाठी
सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. रोजचा रियाज, मोकळेपणाची
स्वच्छ हवा, गैरसमजाच्या साथीचा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना,
सहनशक्तीची लस टोचणे आवश्‍यक आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम
विचारांचा खुराक देणे तितकेच महत्त्वाचे. कोरडेपणा येऊ नये म्हणून
भावनांची शिंपणही हवी. कधीकधी नात्याच्या रोपट्याला अनावश्‍यक विषयांच्या
फांद्या फुटतात त्या वेळीच छाटून टाकाव्या लागतात म्हणजे मूळ नात्याचा
समतोल ढळत नाही, नात्याचा "बोन्साय' होऊ द्यायचा की नाही आपण ठरवायचं...
थोडक्‍यात, नवीन जन्मलेले नाते जगवायचं, वाढवायचं, सुदृढ करायचं हे जसं
खरं, तसंच आधी जन्मलेले नातं त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेत टिकवायचं,
फुलवायचं हेही महत्त्वाचं. त्या सगळ्यासाठी करायला हवा "सारासार विचार',
वागणं- बोलणं, आचार- विचार साऱ्यात हवे. "तारतम्य' प्रत्येकानेच स्वतःशी
घेतली पाहिजे एक शपथ नाते जपण्याची!...

नातं कुरकुरायला लागले तर त्याला वेळीच तेलपाणी करायला हवं, ते
तुटेपर्यंत ताणायचं नाही, तसंच अगदी सैलही सोडायचं नाही. संबंधांचा रथ जर
वेगाने धावायला हवा असेल, तर नात्याची प्रत्येचा किती ताणायची नि किती
सोडायची याचे भान ठेवणे महत्त्वाचे! मग नात्यातलं चैतन्य चिरतरुण होते,
संजीवनी मिळाल्यासारखे!
 

Wednesday, March 28, 2012

आजचा माणूस...

आजचा माणूस...
आजचा माणूस कुठली गोष्ट सगळ्यात चांगली करायला शिकला असेल ना तर ती म्हणजे
'दुर्लक्ष्य करणे'...
'आपलं काही अडत नाहीये ना'... मग दुनिया गयी तेल बेचने हा यांचा Attitude ..
एक व्यक्ती आपल्या आयुष्याची ५-६ वर्ष civil services च्या exam च्या तयारी
साठी बहाल करतो.. खूप काही व्यक्तिगत सुखसोयींच बलिदान करून, अनेकांशी झगडून
तो शेवटी IAS/IPS बनतो..
आपलं संपूर्ण आयुष्यं देशाच्या सेवेसाठी प्रदान करतो..
काहीतरी चांगलं करायला जातो अन या भ्रष्ट नेत्यांच्या किंवा माफियांच्या हस्ते
मारला जातो..
आई बाप पुरते तुटून जातात... आयुष्यभर एकटेच झगडत राहतात..
शेजारी-पाजारी धीर देतात, कॉलोनीतले लोक हळहळ व्यक्त करतात आणि आजचा माणूस
(म्हणजे बाकी सगळेच)
"खूप वाईट झालं.. या देशाच काय होणार देव जाने" एवढ्या शब्दात दिलगिरी व्यक्त
करून सगळा भार देवावर टाकून, "स्व" ची काळजी करायला मोकळे होतात..

हीच माणसं मग dirty picture च्या show ला चार चार आठवडे गर्दी करतात..

सत्य तर हेच आहे...
की स्वतःला 'हुशार' म्हणवणाऱ्या आजच्या या माणसाला खरे "Hero" कोण आहेत हे
अजून ओळखताच आलेलं नाहीये..

दुखं एकाच गोष्टीच आहे...
आजचा माणूस 'हुशार' राहिलाच नाहीये...
तो दिवसेंदिवस "शहाणा" होत चाललाय...
चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणं नसतं।
उंच भरारी घेणा-यानां, आभाळाचे भय नसते।
खुप खुप ताकद लागते,आलेलं अपयश पचवायला।
डोळ्यात आलेलं पाणी पुसुन,ओठाँवर हसु खेळवायला।
करण्यासारखं खुप आहे,उमेद मात्र हवी।
मिळण्यासारखं ध्येय आहे,"जिद्द्"मात्र हवी!
 

शब्द

देता शब्दांना मी चाल
बनतात हातातली ढाल
शब्दांची करता आखणी
शोभे जणू चारोळी देखणी

देता शब्दांना आकार
दिसतो जणू अलंकार
शब्द शब्दातले अंतर
भारून मारलाय मंतर

शब्द शब्दाला जुडावा
देह शब्दासाठीच पडावा
जेंव्हा पडते शब्दात ढील
पाहून हसतात मिश्कील

लागे शहाण्या शब्दाचा मार
मारण्या नको ढाल तलवार
शब्द असे जालीम हत्यार
सुटता चिरी काळीज आरपार
 

Tuesday, March 20, 2012

याचंच नाव जीवन असत ....

चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक पुढे नि एक पाय मागे
पुढच्याला गर्व नसतो
मागच्याला अभिमान नसतो
कारण त्याला माहित असत
क्षणात हे बदलणार असत
याचंच नाव जीवन असत ....
*जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री*


*जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो*

*जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री आणि
फ़क्त प्रेम ..................*

कळतय मला हे बर नाही...!

*मन भरून येन, अस सतत झुरन
डोळ्या पानी येन, अस नेहमीच होण
कळतय मला हे बर नाही...

किती दिवस अस उदास राहणार
स्वताचे सुख दुसरयात शोध नार
कोणाची तरी वाट पाहणार..
त्या वाटे वर तर काहीच चाहुल नाही..

हसता हसता मधेच थांब ने
सगळ्यात असून एक्ट वाटने
सततची ही आठवण येणे..
ज्याच्या साठी झुराव त्याला तर
कश्याचाच पत्ता नाही..

का म्हणून कुणाची अशी वाट बघाव,
का कुणासाठी अस सतत झुराव
आपल मन तरी आपल्या ताब्यात असाव...
कुणाच्या असण्याचे ते बांधील नाही...

ठरवून हव तर मनसोक्त हसाव ...
नाहीच जमल तर भरपूर रडून घ्याव्..
कोणाशी तरी मनसोक्त बोलाव..
नसेल कोणी तर लिहित बसाव..
मग मात्र
दुःखाचे गाठोडे घट्ट बान्धाव..
दूर पाण्यात फिरकाउन दयाव..
की पुन्हा ते परत येणारच नाही..

अजूनही पुढे किती वाटा आहेत..
जग न्यासाठी नविन कारण आहेत..
आजुबाजुला बघा किती मानस आहेत...
आपल्याला जपणारी नाती आहेत..
आपल्याला जीव लावान्यारानहुन
मोलाच या जगात कोणीच नाही..*

सख्खे शेजारी

माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं, तर एक शहाणं!
वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल!

वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं!

वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धीराचं फळ त्याला हवं असतं!

वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजुतीच ओलाव्याने त्याला शांत करतं!

अश्रु

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस - याला विचारले ......
' ए आपण असे कसे रे
ना रंग , ना रूप ,
नेहमीच चिडीचुप ,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर ,
दु : खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर ,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला ,
किनारा ही नाही साधा या पापण्याला ............
दुस - यालाही मग जरा प्रश्न पडला ,
खुप विचार करून तो बोलला ,
रंग - रूप नसला तरी ,
चिडीचुप असलो जरी ,
आधार आपण भावनांचा ,
आदर राखतो वचनांचा ,
सान्त्वनांचे बोल आपण ,
अंतरीही खोल आपण ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे ,
दु : खाच्या प्रसंगी आपलेच महत्व ,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत ,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत ,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा ,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा ,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा ,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच ,
आपले बाहेर पड़णे भाग आहे ,
आपल्यामुलेच आज हे जग आहे .
अशीच आपली कहाणी .........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
जीवनात आलेल्या माणसांना कधीच पर्याय नसतो..... असते ती तडजोड....

कोणीही कितीही चांगला भेटला तरी गेलेल्या व्यक्तीची कमी भरून काढू शकत
नाही.... नवीन येणारी माणसे आधीच्यांपेक्षा जास्त सुख देत असतील कदाचित पण
माणूस फक्त सुखातच मोजता येत नाही ना.....??

त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, त्याचा सहवास, ती व्यक्ती नसण्याचे दु:ख सारं
युनिक असतं, ते परत कधीच मिळू शकत नाही.....

नवीन आलेल्या व्यक्तींसोबत अगदी तशाच प्रकारचा प्रसंग आला कि आपल्याला जुन्या
व्यक्तींची आठवण येणं साहजिकच....

आपण कधी कधी स्वतःलाच आठवत असतो... मी असा होतो..तसा होतो... आपण स्वतःच्या
गतकाळाची देखील कमी भरून काढू शकत नाही मग जीवनात येऊन गेलेल्या व्यक्तींची
कशी काढणार....???

Thursday, March 15, 2012

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे… 

मृगजळाचे भास...............

मृगजळाचे भास...............


गोड आठवणींमागाची रहस्य हळूहळू उलगडत जातात
आणि लक्षात येतात ते मृगजळाचे भास

सत्य माहित असूनही इच्छेअनुरुप स्वप्नं पाहण्याची सवय
पण, उशिरा लक्षात येतात खडबडून जागे करणारे वास्तवि काटे

चंद्र ढगाआड गेला म्हणून रात्रीला त्या आमावस्या म्हणत नाहीत
उन्हाळ्यात पाऊस आला म्हणून त्याला पावसाळा म्हणत नाहीत
एखाद्या भेटीत कोणी जरा गोड बोललं म्हणून त्याला "प्रेम" म्हणत नाहीत

सगळं कळत असत पण मन वळत नसत
नकाराला होकारातच बदलत असत
झाले वार कितीही तरी फुलांप्रमाणे झेलत असत
खूप वेड असत
त्याला सावरणं अवघड खूप असत...............
 

मन, कल्पना आणि आठवणं...

मन, कल्पना आणि आठवणं...
कुठलही भौतिक अस्तित्व नसणाऱ्या पण आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग
असणाऱ्या आणि स्वतःचं अस्तित्व वेळोवेळी दाखवून देणाऱ्या गोष्टी..
मन तर आपलं विचित्रच...
वर्गात 'नागरिकशास्त्राचा' period चालू असतांना कुठल्यातरी थंड हवेच्या ठिकाणी
'पर्यावरणशास्त्राचे' धडे गिरवणं या मनाला कसं जमतं देवच जाणे...
कल्पनेचं पण काही तसंच...
... व्यावहारिक जगाच्या सत्यांना सामोरं जाता जाता सर्व सुखं सोयींनी समृद्ध
असलेल्या काल्पनिक जगात आपल्याला नेण्याचं सामर्थ्य फक्त कल्पनेमधेच असतं...
अन आठवनीन बद्दल तर बोलायलाच नको...
सुखं आणि दुखं या दोन्ही परस्पर विरोधी भावनांची अनुभूती एकाच वेळी करून देणं
आठवणींनाच जमतं...
"आपल्याकडे कमीत कमी आठवणी तर आहेत" ही गोष्ट जेवढी सुखावणारी तेवढीच
"आपल्याकडे आता फक्त आठवणीच आहेत" ही गोष्ट दुखावणारी...
सुखद आठवणी जास्त त्रास देतात...

पण या गोष्टींना भौतिक अस्तित्व नाही तेच बरं..
कारण अस्तित्व सिद्ध झालेल्या गोष्टींच्या सीमा ठरवायची माणसांना वाईट सवय
असते...
अन सीमा ठरवल्या गेल्यात की बंधनं येतात..

काही गोष्टींना बंधनं नसलेलीच बरं...

क्षण तुझे अन् माझे

समोरच्या व्यक्तीने दिलेली सहानभूती दरवेळी आपले समाधान करेलच असे गरजेचे
नाही.
आयुष्याच्या काही क्षणी
"आपण पुरते फसलो आहोत, पण 'फसलो आहोत' असेही म्हणता येत नाहीयेय.
कारण जे मिळालंय ते मिळवण्याची मनापासून इच्छा होती.
जे आहे ते जीवघेणे नाहीयेय....पण ते जसे हवे होते,जसे अपेक्षित होते तसेही
नाहीयेय...
... सहानभूतीने थोडा धीर येईल पण आपली परिस्थिती जैसे थे तशीच राहणार आहे."
याची पूर्ण जाणीव झालेली असते.अश्या वेळी जवळ कुणी नको हवं असतं.
मनात आधीच विचारांची गर्दी असते,बाहेरची गर्दी स्वतःहून त्यात वाढवण्याची
मुळीच इच्छा नसते.
आपल्यावरच्या परिस्थितीच्या सर्व बाजू, सर्व +/- मुद्दे आपल्याला स्वतःला
माहित असतात,
पटतही असतात.....सुखासाठी तडजोड करावी लागणार ह्याची खात्री हि झालेली
असते.....
पण.......शेवटी एकच रुखरुख मनाला लागून राहते ती ह्याची गोष्टीची कि,
"सुखातही कधी कधी फसवणूक होते.."
कारण शेवटी.....
"तडजोडीने मिळालेल्या सुखात माणसाचे लक्ष सुखापेक्षा तडजोडीकडेच जास्त जाते."

Oxygen...

Oxygen...
प्राणवायू ... जगण्यासाठी अत्यावश्शक...
पण जर ठिणगी उडाली अन आग लागली तर त्या आगीला धगधगत ठेवणारा सुद्धा हाच
Oxygen...
भावनाप्रधान माणसांच्या मनाचं देखील काही असंच असतं...
जोपर्यंत त्यांची मन जपली जातात ना तोपर्यंत ते समोरच्याची जीवापाड काळजी
घेतात... पण एकदा का त्यांची मन दुखावली गेली की मग आग लागते... ती क्वचितच
दुसऱ्यांना जाळते.. बहुतेक वेळेस ती भावनाप्रधान व्यक्ती स्वतःच जळत राहते...
...

'किंमत'... भावनाप्रधान माणसांच Oxygen .. त्यावरच ते जगतात...
पण जेंव्हा त्यांची किंमत केली जात नाही तेंव्हा हाच Oxygen त्यांच्या
मनातल्या आगीला धगधगत ठेवतो...

Monday, March 5, 2012

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं
ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्यालाच ठाव असतं

तांबडी लाल माती नि हिरवी गार शेतं
कौलारू घरांची शाकारलेली छतं

कुठल्याश्या घरातून एक म्हातारी बोलावते
ओळखीचे कोणी नाही, हे पाहून तिची पापणी ओलावते

"कोणाची गं पोर तू? ये आत ये", म्हणते
वाकून भाकरी वाढताना जराशी कण्हते

तिच्या हातची चटणी- भाकरी लागते इतकी गोड
कारण त्यात असते माया नि आपुलकीची ओढ

भाकर खाताना माय पाठीवरून हात फिरवते
टचकन डोळ्यांत पाणी येतं नि आईची आठवण येते

बाहेर खाटल्यावर असतो एक म्हातारा
चीपटं- मापटं शरीर नि डोळ्यांपुढे अंधार सारा

जायची वेळ आल्यावर पाय निघता निघत नाही
आपण वळून पाहिलं नाही, तरी गाव पाहत राही

गाव सोडलं तरी मन गावीच राहतं
त्याच्या डोळ्यांनी ते सारं गाव पाहतं

प्रत्येकालाच गावी राहिलेले दिवस परत यावेसे वाटतात
गावची नुसती आठवण झाली तरी डोळ्यांत अश्रू दाटतात

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं

तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं

आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं

आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं

आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं
कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे "क्वारनटाईन" बटण असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते
बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो

आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत, पोचवणारा बाप एक संत असतो

आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं
बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं

कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आई गं SSS” असतं
आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बाप रे बाप" असतं

परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं

म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं

आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

Sunday, March 4, 2012

झाड...

झाड...
एक छान पाऊस पडतो अन जमिनीत लपलेल्या बीजांना अंकुर फुटतो... मग एक छोटंसं
रोपटं आपली मान धर्तीच्या वर काढतं... पण ते मोठं व्हायला कित्येक वर्ष
लागतात... नंतर कधीतरी एक लाकुडतोड्या येतो त्या झाडावर अनेक घाव करतो अन काही
तासात त्याचे लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करतो... त्या लाकडांची
राख करायला मग एक ठिणगीच खूप असते...

नात्यांचही काही तसंच असतं...
अश्याच कुठल्यातरी क्षणी काही भेटीगाठी होतात, त्यात गप्पांचा पाऊस पडतो अन
एका नवीन नात्याला अंकुर फुटतो... मग संवादाच्या निमित्ताने हे नातं आपली मान
वर काढतं... आणि हे नातं जपून ठेवायला वर्षानुवर्षे लागतात... त्याला जोपर्यंत
'विश्वासाचं' खत-पाणी दिलं जातं तोपर्यंत ते सुखरूप वाढतं... पण जर त्यात
'गैरसमज' आला तर मग त्या नात्याचे छोटे छोटे तुकडे होतात... कारण तेंव्हा घाव
सरळ मनावर होतात... आणि एकदा मनं बिघडली की मग त्या नात्याची राख व्हायला
संशयाची एक ठिणगीच खूप असते...

 

जगात तीन प्रकारची माणस असतात...

जगात तीन प्रकारची माणस असतात...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
अन
३. 'वाट' शोधणारे

शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...

काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट'
बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...

'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून
दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात... त्यांच्या आनंदाची परिसीमा
तेवढीच...

त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही
अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...
आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं....

इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!
 

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...
काही निर्णय अशे असतात जे घेऊन आपण परिस्थितीवर मात करतो... तर काही निर्णय
अशे असतात जे आपल्यावर 'लादून' परिस्थिती आपल्यावर मात करते...
पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी... कुठलाही निर्णय घेतल्यावर त्याचा परिणाम काय
होईल हे जसं आपण सांगू शकत नाही तसंच परिस्थितीने आपल्यावर लादलेल्या
निर्णयाचा परिणाम देखील काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही... खुद्द परिस्थिती
सुद्धा नाही... अमुक निर्णय परिस्थितीने लादला म्हणजे त्याचा परिणाम वाईटच
होणार हे जेंव्हा आपण गृहीत धरतो तेंव्हाच आपण परिस्थितीला आपल्यावर मात
करायची संधी देतो...

त्याउलट आपण एकच करावं... पूर्ण ताकदीनिशी झगडावं आणि खंबीरपणे परिस्थितीला
सामोर जावं... ही लढाई प्रत्येकवेळेस तुम्ही जिंकालच असे नाही... कधी
परिस्थितीही जिंकेल.. पण atleast लढता लढता हारल्याच समाधान तर मिळेल... आणि
हेच समाधान तुम्हाला पुढच्या लढाईसाठी सज्ज होण्याची शक्ती सुद्धा देईल...


 

मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये !!!

कडक उन्हात चालावं लागलं कधी तर थकून जाऊन थांबू नकोस... चालत रहा..
कारण मी कडक उन्हानंतर पडणारा मुसळधार पाऊस पाहिलाय...

चालतांना टोचलेत काटे जरी तरी चालत रहाणं थांबवू नकोस...
कारण मी काट्यांना फुलांचं रक्षण करतांना पाहिलंय...

वाटेत आले कितीही अवरोध तरी बावरून वगैरे जाऊ नकोस...
कारण मी अवरोधांना अनेक 'अपघात' होणं टाळतांना पाहिलंय...

गमावलस जरी बरंच काही तरी त्याच्या शोकात हरवून जाऊ नकोस...
कारण सर्व पान झडलेल्या वृक्षांना मी नवीन अंकुर फुटतांना पाहिलंय...

झालाच कधी अंधार आयुष्यात तर स्वतःला असहाय्य मानू नकोस...
कारण मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये...

मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये !!!

आपली सावली...

आपली सावली...
पण तिला आपली म्हणणं कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
ती सावली... ती आपली नसतेच मुळी... तिचं नातं सूर्याशी.. त्याच्या
प्रकाशाशी... सूर्य डोक्यावर आला की तीही आपल्या पायाखाली कुठेतरी लपून
बसते... आपल्याला चटके खायला एकट सोडून... अन सूर्य अस्ताला आला की ती आपले
पांग पसरते... आपण असतो त्यापेक्षा दुप्पट जागा ती व्यापते... मग तिला आपलं
म्हणावं तरी कसं... ती अंधारात आपली साथ सोडते म्हणतात... अरे पण मी म्हणतो
त्या अंधाराला का उगीच दोष... त्याचा गुणधर्मच तो... आणि सावली तरी नेमकी काय
हो... तो सुद्धा अंधारच... रंगीत सावली पाहिलीये का कधी !!
सगळा आपल्या विचारांचा अंधार...
शेवटी आपलं असतं कोण... कुणीच नाही... आपले आपणच असतो ... बस्स !!!!

--

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे…

मी

निळ्या स्वप्नात रमणारा मी
स्वप्न पहाट उजाडण्याची वाट पाहतो
भावनांच्या ओल्या वाळूवर
पावलांचे ठश्यावर ठसे उमटवतो !!
बेचैन वेदनेत रमणारा मी
ओल्या दवात भिजत राहतो
पावसात खेळता खेळता
ओले पाय किनार्यावर रुतवतो !!
रात्रीचे उसाशे पेलणारा मी
वेदनांचे हुंकार झेलीत राहतो
पंख मिटल्या झोपड्यांचे
दुःख अनुभवत राहतो
जीवनाचे संदर्भ कधी शोधतो
तर कधी मोजत राहतो ......

Tuesday, February 28, 2012

भक्ती...

भक्ती...
भक्ती म्हणजे नेमकं काय...
दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक
एक वारी उपवास ...
बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द,
अहंकार, गर्व आणि अट्टाहास...
ही भक्ती नाही... ही आहे सक्ती...
सगळे करतात म्हणून आपणपण करायची सक्ती...
भक्तीत शक्ती असावी.. सक्ती नाही...

कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार देतांना पहावं... जोपर्यंत मडक्याला हवा
तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हाथ त्याला आकार देत असतात... ती खरी
भक्ती...
आईला आपल्या लेकराला गोंजारतांना पहावं .. ती खरी भक्ती...
एखाद्या साधूला बेधुंद होऊन अभंग गातांना पहावं.. ती खरी भक्ती...
चिमणीला आपल्या पिल्लांना भरवतांना पहावं.. ती खरी भक्ती...
'मनापासून' केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भक्ती..

अहो ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन तुम्ही 'हे काम झालं तर १
नारळ फोडीन' म्हणून लालूच दाखवता... सृष्टीच्या निर्मात्यालाच तुम्ही चक्क चार
भिंतीच्या आत कोंडून ठेवता.. वाह रे माणसा ...
भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत... किंबहुना भक्तीला सीमाच नाहीत...
भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो !!!

आपली सावली...

आपली सावली...
पण तिला आपली म्हणणं कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
ती सावली... ती आपली नसतेच मुळी... तिचं नातं सूर्याशी.. त्याच्या
प्रकाशाशी... सूर्य डोक्यावर आला की तीही आपल्या पायाखाली कुठेतरी लपून
बसते... आपल्याला चटके खायला एकट सोडून... अन सूर्य अस्ताला आला की ती आपले
पांग पसरते... आपण असतो त्यापेक्षा दुप्पट जागा ती व्यापते... मग तिला आपलं
म्हणावं तरी कसं... ती अंधारात आपली साथ सोडते म्हणतात... अरे पण मी म्हणतो
त्या अंधाराला का उगीच दोष... त्याचा गुणधर्मच तो... आणि सावली तरी नेमकी काय
हो... तो सुद्धा अंधारच... रंगीत सावली पाहिलीये का कधी !!
सगळा आपल्या विचारांचा अंधार...
शेवटी आपलं असतं कोण... कुणीच नाही... आपले आपणच असतो ... बस्स !!!!
 
बेधुंद आणि निरागस जगणं काय असतं हे समजायचं असेल ना तर आपण आपलं बालपण
आठवावं...

तेंव्हा कुठल्याच गोष्टीला 'अर्थ' नसायचा... कुठलीही गोष्ट 'का' करायची हा
प्रश्न नसायचा...

मग ते मातीत/चिखलात खेळणं असो, की मांजरीला जाऊन बेधडक धरणे असो...
घराच्या अंगणात मनसोक्त बागडणं असो की गुढ्ग्याची टोपर फुटूस्तर धडपडण असो...

पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं हे जग आपल्याला अर्थ शोधायची सवय
लावतं... निरर्थक गोष्टींमध्ये अर्थ शोधण्याच्या नादात आपण त्या 'निरागस'
स्वतः ला कुठेतरी हरवून बसतो... मग ही व्यवहारी दुनिया 'फायदा' या शब्दाचा
आडोसा घेऊन त्या 'स्व' मधेच सर्व ‘अर्थ’ आहे हे आपल्या डोक्यात भरवते... इथेच
सगळा घोळ होतो...
कारण जेंव्हा 'स्व' आणि 'अर्थ' हे शब्द जुळतात तेंव्हा त्याचा 'स्वार्थ'
होतो... आणि एकदा स्वार्थ आलं म्हणजे तिथे निरागसतेला स्थान रहात नाही...मग
बाकी गोष्टी तश्यापण निरर्थकच !!!!
 
*जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं, आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे
आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो, याचंच नाव 'आयुष्य'
असतं...!*
 

आठवण ..

आठवण ..
सगळ्यांनाच येते...
मोठ्यांना लहानपणाची अन लहाणांना मोठ्यांची...
बाबांना आपल्या शाळेची... अन पिंकी ला आपल्या आजोबांची...
आईला आपल्या आबांची अन आबांना आपल्या चिऊ ची...
कोणाला आपल्या ताईची तर ताईला माहेरच्या अंगणातल्या जाईची...
हरवलेल्या आपल्या मित्रांची... रंगवलेल्या त्या बेधुंद चित्रांची...
कट्ट्यावर भरवलेल्या त्या सभांची... आनंदात घालवलेल्या त्या क्षणांची...
गर्दीत सुटलेल्या हाथांची... अकारण तुटलेल्या काही नात्यांची...
तिला त्याची अन त्याला तिची...

आठवण...
एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...
आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...

हवेला गंध नसतो..
पाण्याला रंग नसतो..
अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो !!!

 

Saturday, January 14, 2012

*उपदेश देयला सगलेच असतात
मात्र समजून घेणार कोणीच का नसते
सुखात सगलेच सहभागी होतात
पण दुखत मात्र अदृश्य का होतात
जीवंत असताना कोणीच जवळ नसते
मग मेल्यावर का सगळे एकत्र येतात
हे आयुष्य असे का असते
जिथे गरज असताना कोणीच का नसते.....??*

* मैत्री करत असाल तर *

*मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!

शेवटी एकच सांगू इच्छीतो की,
मैत्री करत असाल तर
नुसतेच मित्र म्हणुन Add करून ठेवू नका
किमान एक mail करून आपण *
*या मित्राची/मैत्रीणीची आठवण ठेवा......!!!!!
*

काही म्हणी .................

 
     म्हणी तर सर्वांना माहित आहेतच आणि त्याचा वापरही आपण करतो पण सगळ्याच म्हणींचा अर्थ आपल्याला माहित आहे का? काही म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत ..अजून कोणाला वेगळ्या म्हणी आणि त्याचे अर्थ माहित असेल तर प्लीज शेअर करा .. # पी हळद हो गोरी - उतावळेपणा दाखविणे # मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही # बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर - दोनपैकी एक पर्याय निवडणे # चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच # आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे # उंटावरचा शहाणा - मूर्ख सल्ला देणारा # अडला हरी गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते # नाचता येईना अंगण वाकडे - स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो # तोंड दाबून बुक्क्यांचा मार - विनाकारण जुलूम सहन करावा लागणे # नावडतीचे मीठ अळणी - नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही # अंथरूण पाहून पाय पसरावे - ऎपत पाहून खर्च करवा # छत्तीसाचा आकडा - विरुद्ध मत असणे # तेरड्याचा रंग तीन दिवस - एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे # दुष्काळात तेरावा महिना - संकटात अधिक भर # नव्याचे नऊ दिवस - नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही # एका हाताने टाळी वाजत नाही - दोष दोन्हीकडे असतो # पालथ्या घड्यावर पाणी - सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे # वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो # रात्र थोडी सोंगे फार - काम भरपूर, वेळ कमी # अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपणाने नुकसान होते # शेरास सव्वाशेर - प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ # नाकाचा बाल - अत्यंत प्रिय व्यक्ती # नाकापेक्षा मोती जड होणे - डोईजड होणे # आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही बाजूंनी अडचण # कामापुरता मामा - काम साधण्यापुरते गोड बोलणे # आधी पोटोबा मग विठोबा - अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे # काखेत कळसा गावाला वळसा - वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे # झाकली मूठ सव्वा लाखाची - दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत # पायीची वहाण पायी बरी - योग्यतेप्रमाणे वागवावे # मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये # उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे # कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही # कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात # गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते # घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे # डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे # भरंवशाच्या म्हशीला टोणगा - पूर्ण निराशा करणे # वरातीमागून घोडे - एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे # पाण्यात राहून माशाशी वॆर - बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे? # खायला काळ भुईला भार - ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो # तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले - दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे # नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी पण कृती छोटी # हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते # कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे # गर्जेल तो पडेल काय? - पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही # टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही - कष्टाशिवाय यश मिळत नाही # वारा पाहून पाठ फिरवावी - वातावरण पाहून वागावे # कुंपणानेच शेत खाणे - रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे # दगडावरची रेघ- कायमची गोष्ट जेवढे माहित होते ते लिहिले अजून जास्त कोणाला माहित असतील तर सांगा !!! --