Tuesday, April 24, 2012


जे नाहीयेय आणि ते हवंय त्याला 'अपेक्षा' म्हणतात.....
जे हवंय आणि नाही मिळतंय त्याला 'उपेक्षा' म्हणतात.....
मग जे आधीपासून जवळ आहे ते काय आहे?......'निरर्थक'?????....
जे नाहीयेय ते मिळाले नाही कि दु:ख करत बसताना खरी उपेक्षा कोणाची होते?
ज्याला काही मिळाले नाही त्याची.....?
... कि जे आधीच मिळालेय आणि दुर्लक्षित केलं जातंय त्याची??????
आपण कुणाच्या तरी आयुष्यात असूनही समोरच्याच्या नजरेतला शोध नाही थांबला
कि 'अवहेलना' आणि 'तूच्छ' या शब्दांचा खरा अर्थ कळतो आणि अनुभव येतो....
आणि सगळ्याच जखमांना औषध नसतं....अवहेलनेला तर नाहीच नाही.....
त्याहून मोठी गळचेपी अशी कि.....अपेक्षांना अंत नसतो....
आयुष्याच्या बाबतीत "१००%" हि संख्या काल्पनिक आहे...

No comments:

Post a Comment