पतंग जेंव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेंव्हा त्याचं सगळं श्रेय पतंगाची दोर
ज्याच्या हातात आहे त्यालाच जातं...
पतंग उडवणाऱ्याला पण ते श्रेय ढगात नेऊन पोहोचवत... त्यालापण खरतर तेच हवं
असतं...
पण त्या पतंगाला खरी भरारी देणारा तो वारा... त्याचं काय...!!!
तो यथेच्छ दुर्लक्षिला जातो... कारण तो वारा कुठलाही जाब विचारत नाही की
कुठलीही बढाई मारत नाही...
तो अगदी मुकाट्याने आपलं काम करतो... तो पतंगाला तर आकाशात उंच भरारी घेऊन
देतोच पण पतंग उडवणाऱ्याला सुद्धा पतंग 'आपल्या' कौशल्या मुळे उडतोय हा भाबडा
भास ही देऊन जातो... तेच त्या वाऱ्याच खरं सामर्थ्य...
आयुष्यं पण तसं काही वेगळं नाही... इथे काही लोकं अशी भेटतात जी तुमच्या
सफलतेत फक्त दोरीला झटके मारायचं काम करतात, अन तुम्हाला सफलतेच्या शिखरावर
पोहोचवण्याच संपूर्ण श्रेय ते घेऊन जातात... अगदी काहीच न करता सुद्धा... कारण
त्या गगनभरारी मागे खरं कर्म असतं वाऱ्याएवढा अर्पनभाव असणाऱ्या काही
लोकांचं.. ही लोकं शांतपणे आपलं काम करतात... तुमचं सुखं कशात आहे हे ते
ओळखतात, अन मग तुमच्या नकळत, स्वतःवर दुखं ओढवूनही, ते तुम्हाला तुमची ती
गगनभरारी घ्यायला मदत करतात... पण त्या वाऱ्या सारखीच ही मंडळी सुद्धा यथेच्छ
दुर्लक्षिली जातात... कारण ती जाब मागत नाहीत... त्यांना श्रेय नको असतं...
त्यांना हवी असते तुमची ख़ुशी... त्यातच ते आनंद मानतात... पण अश्या लोकांना
ओळखण्यातच आपण बहुतेक वेळा चूक करतो...*
ज्याच्या हातात आहे त्यालाच जातं...
पतंग उडवणाऱ्याला पण ते श्रेय ढगात नेऊन पोहोचवत... त्यालापण खरतर तेच हवं
असतं...
पण त्या पतंगाला खरी भरारी देणारा तो वारा... त्याचं काय...!!!
तो यथेच्छ दुर्लक्षिला जातो... कारण तो वारा कुठलाही जाब विचारत नाही की
कुठलीही बढाई मारत नाही...
तो अगदी मुकाट्याने आपलं काम करतो... तो पतंगाला तर आकाशात उंच भरारी घेऊन
देतोच पण पतंग उडवणाऱ्याला सुद्धा पतंग 'आपल्या' कौशल्या मुळे उडतोय हा भाबडा
भास ही देऊन जातो... तेच त्या वाऱ्याच खरं सामर्थ्य...
आयुष्यं पण तसं काही वेगळं नाही... इथे काही लोकं अशी भेटतात जी तुमच्या
सफलतेत फक्त दोरीला झटके मारायचं काम करतात, अन तुम्हाला सफलतेच्या शिखरावर
पोहोचवण्याच संपूर्ण श्रेय ते घेऊन जातात... अगदी काहीच न करता सुद्धा... कारण
त्या गगनभरारी मागे खरं कर्म असतं वाऱ्याएवढा अर्पनभाव असणाऱ्या काही
लोकांचं.. ही लोकं शांतपणे आपलं काम करतात... तुमचं सुखं कशात आहे हे ते
ओळखतात, अन मग तुमच्या नकळत, स्वतःवर दुखं ओढवूनही, ते तुम्हाला तुमची ती
गगनभरारी घ्यायला मदत करतात... पण त्या वाऱ्या सारखीच ही मंडळी सुद्धा यथेच्छ
दुर्लक्षिली जातात... कारण ती जाब मागत नाहीत... त्यांना श्रेय नको असतं...
त्यांना हवी असते तुमची ख़ुशी... त्यातच ते आनंद मानतात... पण अश्या लोकांना
ओळखण्यातच आपण बहुतेक वेळा चूक करतो...*
No comments:
Post a Comment