*जि माणसं आपल्या खांद्यावर हात टाकतात;*
*अन आपल्या बेसावध क्षणी आपल्याला;*
*स्वतःचा खांदाच देऊन टाकतात;*
*अशी ही माणसं जरा खासच असतात.*
*अशी माणसं आयुष्यभर आपल्याला;*
*काही न काही देतच राहतात;*
*स्वतःची ओंजळ रिकामी झाली तरी;*
*जन्मभर पुरेल इतकं प्रेम मात्र देतात.*
*वेदना कुठे आपल्याला झाली तर;*
*अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात;*
*चुकलोच आयुष्याच्या वळणावर कधी;*
*तर आरशाप्रमाणे प्रामाणिक राहतात.*
*आयुष्यात कधी आलाच दाटून अंधार;*
*तर खास माणसांच्या पाऊलखुणा शोधायच्या;*
*आपण फक्त त्यावर आपली पावलं ठेवायची;*
*वाटा आपोआप सापडायच्या.*
*अशा या खास माणसासाठीचं फक्त;*
*आयुष्य पुन्हा जगावंस वाटत;*
*त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम;*
*मनाच्या कप्प्यात जपावंस वाटत.*
*अन आपल्या बेसावध क्षणी आपल्याला;*
*स्वतःचा खांदाच देऊन टाकतात;*
*अशी ही माणसं जरा खासच असतात.*
*अशी माणसं आयुष्यभर आपल्याला;*
*काही न काही देतच राहतात;*
*स्वतःची ओंजळ रिकामी झाली तरी;*
*जन्मभर पुरेल इतकं प्रेम मात्र देतात.*
*वेदना कुठे आपल्याला झाली तर;*
*अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात;*
*चुकलोच आयुष्याच्या वळणावर कधी;*
*तर आरशाप्रमाणे प्रामाणिक राहतात.*
*आयुष्यात कधी आलाच दाटून अंधार;*
*तर खास माणसांच्या पाऊलखुणा शोधायच्या;*
*आपण फक्त त्यावर आपली पावलं ठेवायची;*
*वाटा आपोआप सापडायच्या.*
*अशा या खास माणसासाठीचं फक्त;*
*आयुष्य पुन्हा जगावंस वाटत;*
*त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम;*
*मनाच्या कप्प्यात जपावंस वाटत.*
No comments:
Post a Comment