Sunday, March 4, 2012

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...
काही निर्णय अशे असतात जे घेऊन आपण परिस्थितीवर मात करतो... तर काही निर्णय
अशे असतात जे आपल्यावर 'लादून' परिस्थिती आपल्यावर मात करते...
पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी... कुठलाही निर्णय घेतल्यावर त्याचा परिणाम काय
होईल हे जसं आपण सांगू शकत नाही तसंच परिस्थितीने आपल्यावर लादलेल्या
निर्णयाचा परिणाम देखील काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही... खुद्द परिस्थिती
सुद्धा नाही... अमुक निर्णय परिस्थितीने लादला म्हणजे त्याचा परिणाम वाईटच
होणार हे जेंव्हा आपण गृहीत धरतो तेंव्हाच आपण परिस्थितीला आपल्यावर मात
करायची संधी देतो...

त्याउलट आपण एकच करावं... पूर्ण ताकदीनिशी झगडावं आणि खंबीरपणे परिस्थितीला
सामोर जावं... ही लढाई प्रत्येकवेळेस तुम्ही जिंकालच असे नाही... कधी
परिस्थितीही जिंकेल.. पण atleast लढता लढता हारल्याच समाधान तर मिळेल... आणि
हेच समाधान तुम्हाला पुढच्या लढाईसाठी सज्ज होण्याची शक्ती सुद्धा देईल...


 

No comments:

Post a Comment