*जाणे कुठे हरवले ते दिवस...
फुटलेल्या घोट्यांचे...
अन तुटलेल्या झोक्यांचे...
किती धडपडायचो तेंव्हा... काही गणितच नाही...* *
तेंव्हापण सोलायचेच ना कोपरे अन गुढगे...
थोडावेळ दुखायचे सुद्धा ..
घळाघळा वाहायचे अश्रू...
पण तितक्याच लवकर वाळून पण जायचे...
परत खेळायला लागलो ना की ते दुखणं कुठल्या कुठे पळून जायचे...
कारण तेंव्हा कारणे शोधा?? हा प्रश्न फक्त एकदाच, म्हणजे, वार्षिक परीक्षेतच
यायचा...
तसंपण तेंव्हा आपल्याकडे पाटी अन पेन्सील असायची...
जे वाटेल ते काढायचं... आवडलं तर परत परत तेच गिरवायच...
अन नाही आवडलं तर सरळ सरळ पुसून टाकायचं...
मग आपण मोठे झालो... आणि सगळी सोय गेली...
व्यावहारिक जगात अन स्वार्थी माणसांत "टिकून राहणं" म्हणजे रोजच एक नवी
परीक्षा...
त्या परीक्षेतल्या प्रश्नांची कारणं शोधता शोधता मग सगळी निरागसता हरवते...
न असलेली दुखणी पण मग अश्यावेळी खूप दुखायला लागतात...
कारण परत खेळ सुरु करायची आपल्या मनाची मुळीच इच्छा नसते...
त्यामुळे ते त्या नसलेल्या दुखण्यातच पळवाट शोधत फिरते...
अश्यावेळी मग अश्रू पण दगा देतात... मुक्तपणे गालावरून ओघळत नाहीत ते...
फक्त पापण्या ओल्या करून जातात...
ओल्या पापण्या सहसा कोणाला दिसत नाहीत... त्या बघायला अंतरंगाचे सूर जुळावे
लागतात... अन अशी माणसं खूप कमी भेटतात...
मोठेपणी आपली पाटी-पेन्सील हरवते...
आणि त्याची जागा घेते "Permanent Marker" ...
म्हणजे "पुसून टाकायची" सोय रहात नाही...
एकदा जे गिरवलं ते पुसता येत नाही...
त्याचे "Marks" फक्त आयुष्यभर आपल्या सोबत राहतात...
लहानपणीच्या जखमा शरीरावरचे सालटे काढतात...
अन मोठेपणीच्या..... मनावरचे !!!!*
फुटलेल्या घोट्यांचे...
अन तुटलेल्या झोक्यांचे...
किती धडपडायचो तेंव्हा... काही गणितच नाही...* *
तेंव्हापण सोलायचेच ना कोपरे अन गुढगे...
थोडावेळ दुखायचे सुद्धा ..
घळाघळा वाहायचे अश्रू...
पण तितक्याच लवकर वाळून पण जायचे...
परत खेळायला लागलो ना की ते दुखणं कुठल्या कुठे पळून जायचे...
कारण तेंव्हा कारणे शोधा?? हा प्रश्न फक्त एकदाच, म्हणजे, वार्षिक परीक्षेतच
यायचा...
तसंपण तेंव्हा आपल्याकडे पाटी अन पेन्सील असायची...
जे वाटेल ते काढायचं... आवडलं तर परत परत तेच गिरवायच...
अन नाही आवडलं तर सरळ सरळ पुसून टाकायचं...
मग आपण मोठे झालो... आणि सगळी सोय गेली...
व्यावहारिक जगात अन स्वार्थी माणसांत "टिकून राहणं" म्हणजे रोजच एक नवी
परीक्षा...
त्या परीक्षेतल्या प्रश्नांची कारणं शोधता शोधता मग सगळी निरागसता हरवते...
न असलेली दुखणी पण मग अश्यावेळी खूप दुखायला लागतात...
कारण परत खेळ सुरु करायची आपल्या मनाची मुळीच इच्छा नसते...
त्यामुळे ते त्या नसलेल्या दुखण्यातच पळवाट शोधत फिरते...
अश्यावेळी मग अश्रू पण दगा देतात... मुक्तपणे गालावरून ओघळत नाहीत ते...
फक्त पापण्या ओल्या करून जातात...
ओल्या पापण्या सहसा कोणाला दिसत नाहीत... त्या बघायला अंतरंगाचे सूर जुळावे
लागतात... अन अशी माणसं खूप कमी भेटतात...
मोठेपणी आपली पाटी-पेन्सील हरवते...
आणि त्याची जागा घेते "Permanent Marker" ...
म्हणजे "पुसून टाकायची" सोय रहात नाही...
एकदा जे गिरवलं ते पुसता येत नाही...
त्याचे "Marks" फक्त आयुष्यभर आपल्या सोबत राहतात...
लहानपणीच्या जखमा शरीरावरचे सालटे काढतात...
अन मोठेपणीच्या..... मनावरचे !!!!*
No comments:
Post a Comment