दुसऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊन जगणाऱ्या
माणसांच आयुष्यं हे त्या दिव्यासारखं असतं...
एखाद्याच्या आयुष्यात अंधार पडला की मग त्यांना दिव्याची आठवण येते...
दिव्याच सामर्थ्य हेच... तो स्वतः जळत राहतो पण परिसरातला अंधार नाहीसा करून
तिथे रोषणाई करतो...
अन असं नाही की त्याला जळत राहायला त्रास होतो...
त्यात जोपर्यंत प्रेमाचं, किंमतीच, विश्वासाचं तेल ओतलं जातं तोपर्यंत तो दिवा
अगदी स्वखुशीनं जळत राहतो...
त्याला बस तेवढंच हवं असतं...
पण शेवटी माणसं ही... अंधारात त्यांचे चेहरे दिसत नाहीत...
अन जेंव्हा त्या अंधाऱ्या रात्रीची पहाट होते तेंव्हा त्या उजेडात त्यांचे खरे
चेहरे समोर येतात...
तेंव्हा त्यांची "गरज" संपलेली असते... अश्या वेळी मग ते हमखास दिवा विझवतात...
मग विझवलेल्या दिव्याच्या आयुष्यात भर दिवसा "अंधार" पडतो...
विझलेले दिवे कोणाच्याच आयुष्यातला अंधार दूर करू शकत नाहीत...
"स्वतःच्या सुद्धा नाही" !!!!
माणसांच आयुष्यं हे त्या दिव्यासारखं असतं...
एखाद्याच्या आयुष्यात अंधार पडला की मग त्यांना दिव्याची आठवण येते...
दिव्याच सामर्थ्य हेच... तो स्वतः जळत राहतो पण परिसरातला अंधार नाहीसा करून
तिथे रोषणाई करतो...
अन असं नाही की त्याला जळत राहायला त्रास होतो...
त्यात जोपर्यंत प्रेमाचं, किंमतीच, विश्वासाचं तेल ओतलं जातं तोपर्यंत तो दिवा
अगदी स्वखुशीनं जळत राहतो...
त्याला बस तेवढंच हवं असतं...
पण शेवटी माणसं ही... अंधारात त्यांचे चेहरे दिसत नाहीत...
अन जेंव्हा त्या अंधाऱ्या रात्रीची पहाट होते तेंव्हा त्या उजेडात त्यांचे खरे
चेहरे समोर येतात...
तेंव्हा त्यांची "गरज" संपलेली असते... अश्या वेळी मग ते हमखास दिवा विझवतात...
मग विझवलेल्या दिव्याच्या आयुष्यात भर दिवसा "अंधार" पडतो...
विझलेले दिवे कोणाच्याच आयुष्यातला अंधार दूर करू शकत नाहीत...
"स्वतःच्या सुद्धा नाही" !!!!
No comments:
Post a Comment