Tuesday, May 29, 2012

ह्या मातीच ऋण फेडायचं... ह्या मातीच आपण काही देणं लागतो...

    ह्या मातीच ऋण फेडायचं... ह्या मातीच आपण काही देणं लागतो...
    ही असली वाक्य आपण ऐकलीच असतील...
    पण काही वर्षांपूर्वीच...

    आजकालच्या so called 'Modern' माणसाचा मातीशी संबंध राहिलाच कुठे आहे...
    मातीची घरं...
    अर्थातच... आजही काही गावात आहेत मातीची घरं... पण खूप मोजकीच...
    बाकी गावांच शहरीकरण झालं... अन मातीची जागा सिमेंट ने घेतली...
    अन Modernization च्या धुंदीत बेधुंद झालेल्या या शहरी माणसाला मातीची कधी
    'धूळ' झाली हे कळलंच नाही...
    मातीची धूळ झाली आणि धुळीची 'Allergy'... अन झाला माणूस मातीपासून दूर...

    ज्या घरात राहतात... त्या घरातली माणसं सुद्धा तशीच वागतात...
    जशी गरज तश्या आकारात घडण्याचा मातीचा गुणधर्म नकळतच मातीच्या घरात राहणाऱ्या
    माणसांत पण यायचा...
    ती माणसं मोकळ्या मनाने वागायची, समजून घ्यायची, मिळून-मिसळून राहायची...

    मग माणसांनी सिमेंट ची घरं बांधलीत अन त्यांची मनं त्यांनी त्यात कोंडून
    घेतली...
    आणि वरवरच्या रंगरंगोटी ने माखलेल्या या सिमेंट च्या घरातली माणुसकीच हरवली...

    सगळे जण आपले घराचे अन मनाचे दोन्ही दारं बंद करून मधे पडून असतात हल्ली !!!



    --


    *जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं,
    ते आपल्याला नको असतं, आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे
    आपल्याकडे असतं,
    ते आपल्याला आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो, याचंच नाव 'आयुष्य'
    असतं...!*

No comments:

Post a Comment