Thursday, July 7, 2011

"डोळ्यात तुझ्या पाहू दे"

 
तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळी करपेल, थांब जरा राहू दे"
तो म्हणाला "काय बिघडेल स्वयपांक नाही केला तर ?"
ती म्हणाली " आई रागावतील, दुध उतू गेल तर !"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
..."पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"
"बर मग संध्याकाळी आपण दोघेच picture ला जाऊ"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामध्ये भाजी झाली तिखट"
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुधा माजघरातून मुसमुस
सिगारेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिडकी आडून
दमला भागाला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरुवात नक्की करावी कुठून दोघानाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली.
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर" आणि तो विरघळला
"थोडासा........
.." त्याने सुधा कबूल केला आपला राग
ती म्हणाली " बाहेर जाऊन किती सिगारेट्स ओढल्यास सांग?"
"माझी सिगारेट जळताना तुझ जळन आठवल
अपेक्षांचं ओझ तू किती सहज पेललस
सगळ्याच सुख दुख तळहातावर झेललस......
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावसं?"
बोललास हेच पुरेस झाल.... एकाच फक्त विसरलास....
माप ओलांडून आले होते, "मी-तू" पण तेव्हाच गळल
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळल?"..

No comments:

Post a Comment