Thursday, July 7, 2011

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं .
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं ,

मित्र अनेक असतात ,
 पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात .
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात .

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं .
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं .
एकमेकांचं अश्रू झेलून , हसत पुढे जायचं असतं .

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं ,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं .

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं .
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं .

पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं .
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं

No comments:

Post a Comment