चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं .
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं ,
मित्र अनेक असतात ,
पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात .
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात .
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं .
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं .
एकमेकांचं अश्रू झेलून , हसत पुढे जायचं असतं .
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं ,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं .
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं .
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं .
पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं .
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं
No comments:
Post a Comment