Friday, July 15, 2011

"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

"जन्म देणारी माता मुल पोटात असताना नऊ महिने नऊ दिवस कधी होतील आणि केव्हा पोट
हलके होईल ह्याची वाट पहाते. चार दिवस अधिक गेले तर कधी बालंतीन होणार म्हणून
डॉक्टरांना विचारते. मुलगी असेल तर ती उपवर होताच जावयच्या हातात देऊन मोकळी
होते, आणि मुलगा असल्यास तो शिक्षण संपवून नोकरी करू लागला कि त्याला सुनेच्या
ताब्यात देऊन मोकळी होते, पण गुरुमाता मात्र आपले अनंत अपराध पोटात घालून, नाना
प्रकारे बोध करून जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करते आणि भवबंधनातून सोडवून
आपणांस कायमचे सुखी करते"
आपण "माणूस जन्म - प्राणी जन्म - माणूस जन्म " अश्या भवचक्रात सापडून दुखं,
संकटे व त्रास भोगत आहोत, अश्या ह्या बिकट भवचक्रातून सुटण्यासाठी आपण फक्त आणि
फक्त मनुष्य जन्मातच देवाची कृपा संपादन करू शकतो, आणि देवाची हि कृपा संपादन
करून देण्यासाठी केवळ गुरु हे एकच समर्थ आहेत. आपण मनुष्यच काय तर, साक्षात
देवाने सुद्धा मानव अवतारात गुरु करून घेतले होते, आणि गुरुचे महत्व पटवून दिले
होते , जसे कि ....
श्री रामाचे गुरु वशिष्ठ
श्री कृष्णाचे गुरु सांदीपन
मग आपण तर फार साधी माणसे आहोत, आपल्यासाठी गुरु करून घेणे किती महत्वाचे आहे
नाहीका ? ह्यावरून सुखी जीवन जगण्यासाठी व मुक्ती मिळवून ह्या भवचक्रातून
कायमचे सुटण्यासाठी गुरुंच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची फार जरुरी आहे हे कळून
येते.
" अश्या बिकट भवचक्रातून आपली सुटका व्हावी हि इच्हा "


"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:

Post a Comment