वडिल......आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वालाखरच आम्ही कधी समजून घेतलेले आहे का ? वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही.कोणताही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो. संत महात्म्यानीही आईचचं महत्व अधिकसांगितलं आहे. देवदिकांनीही आईचेच गोडवे गायले आहेत.. लेखकांनी कवींनी आईचंतोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते पण बापविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोहीतापट, व्यसनी, मारझोड करणाराच. समाजात एक दोन टक्के बाप असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होतेपण सान्त्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणार्यापेक्षा सान्त्वन करणार्या वरच जास्त ताण पडतो कारणज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमी ज्योतिलाच मिळत राहतं !रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरिचिसोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वासमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशित तोंड खुपसुन मुसमुसतो तोबाप असतो . आई रडते वडिलांना रडता येत नाही, स्वतः चा बाप वारला तरीही त्याला रडता येतनाही, कारण छोट्या भावंडांना जपायचा असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारणबहिनिंचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी पॉरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडविला अस अवश्य म्हणावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओढतानसुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्रवीयोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.
वडिलांच्या टाचा झिजलेल्या चप्लांकडे बघितलं की त्यांच प्रेम कळते. त्यांचेफाटके बॅनियान बघितलं की कळतं "आमच्या नशीबाची भोक
त्यांच्या बॅनियानला पडलीत".त्यांचा दाढी वाढवलेला चेहरा त्यांची काटकसरदाखवितो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वतः
मात्र जुनी पॅंटच वापरतील.मुलगा सलुन मध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगीपार्लर मध्ये खर्च करते, पण त्याच घरात बाप दाढीचा साबण संपला म्हणूनआंघोळीच्या साबणाने दाढी करतो.अनेकदा नुसतं पाणी लावून दाढी करतो.बाप आजारीपडला तरी लगेच दावाखान्यात जात नाही, तो
आजारपनाला घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्यालाभीती वाटते कारण पोरिच लग्न, पोरांच शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाच दुसरंसाधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल, इंजिनियरिंग ला प्रवेश मिळवून दिलाजातो, ओढतान सहन करून मुलाला दरमहिन्याला पैसे पाठविले जातात. पण सर्वच नसलीतरीही काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि
ज्या बापानी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्याघराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ताजिवंत असतो, तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचकर्म बघत असतो, सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणंटाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई
होण्याला बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते,कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहतनाही. पाहितलकरणीच खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणार्या त्या बाळाच्या बापची कोणीही दाखल घेत नाही.
चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर 'आई गं' हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता पारकरताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा 'बाप रे' हाच शब्द बाहेर पडतो.छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतय ना?
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण मयताच्या प्रसंगी बापलाच जावंलागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो,पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशिरा घरीयेतो तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढेलाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उम्बर्ठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठीस्वतः च्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो ना?
वडिलांचं महत्व कोणाला कळतं ? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदर्या खूपलवकर पेलाव्य लागतात, त्यांना एकेका वस्तुसठी तरसावं लागतं. वडिलांना खर्याअर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासूनदूर असलेल्या मुलीला फोनवर
बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो, ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्याबोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असच आपल्यालाजाणावं हीच बापची किमान अपेक्षा असते.
No comments:
Post a Comment