Friday, March 30, 2012

नातं फुलणारं... डोलणारं... (मुक्तपीठ)


नाती क्षणोक्षणी साथ करत असतात... काही अल्पजीवी, तर काही चिरंतन... काही
प्रेमाची तर काही अशीच... ही नाती सांभाळायची असतात... कुरकूर व्हायला
लागली तर त्यांना स्नेहाचं वंगण घालावं लागतं... तुटेपर्यंत ताणायचं नाही
आणि अगदी सैलही सोडायचं नाही.. हे जमलं की नात्यांचा सुगंध आपलाच...

"प्रत्येक नात्याला एक वय असतं आणि प्रत्येक वयावर एक नातं असतं...'
वाक्‍य वाचलं आणि इतके विचार मनात आले, खरंच किती खरं आहे हे! प्रथम मनात
आलं नक्की नातं म्हणजे काय? रक्ताचं नातं, जोडलेले नातं, नाळेचं नातं!

आई-मुलाचं नातं जन्मायला आधी नाळ कापावी लागते. त्याआधी ती दोघे एकच
असतात. तिच्याच शरीराचा भाग जो आधी असतो त्याला वेगळे केले, स्वतंत्र
अस्तित्व दिले की "नातं' जन्माला येतं म्हणजे नात्यात एकरूपता, एकजीवता
असते, तर एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले असते आणि अशा दोन
स्वतंत्र बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे नाते. त्यात अलगता, वेगळेपणा असतो
तरीही एकमेकांना सांधणारा एक अदृश्‍य दुवा असतो. मग तो प्रेमाचा असेल,
समविचारांचा असेल, सहवेदनेचा असेल, सहकार्याचा असेल, कुठलाही असेल त्या
दुव्यालाच आपण नातं म्हणतो ते जन्माला येतं, अशाच एका क्षणी, की ज्यावर
खरं तर आपला कंट्रोल नसतो, जसं मूल जन्माला यावं तसं नातं जन्माला येतं
आणि अशाच एका क्षणी ते पंचत्वात विलीन होतं माणसाच्या मृत्यूसारखं...

फक्त त्या नात्याचं वाढणं, बहरणं, खुरटणं, अकस्मात संपणं, परत
पुनर्जन्मासारखे नव्याने जन्माला येणं आपण बघायचं असतं. काही नाती
अल्पायुषी ठरतात. काही दीर्घायुषी असतात. कित्येकदा त्या नात्याचं नुसतं
वयंच वाढतं. गुणात्मक मूल्य त्याचं काहीच नसतं. त्या उलट अल्पायुषी नातं
शतायुषी समाधान देऊन जातं.

कित्येकदा नातं जन्मापासूनच अशक्त असतं. थोडासा वातावरणात, परिस्थितीत
बदल झाला तरी ते आजारी पडतं. वाटतं, आता काय? पण समजुतीचे टॉनिक औषध
दिलं, की परत मूळ पदावर येतं. काही नाती मुळातच सशक्त असतात. कितीही वादळ
वारे आले, त्सुनामी आली, साथीचे रोग आले, तरी टक्कर द्यायची त्या नात्यात
हिंमत असते. काही नाती "हलकी' वजनरहित असतात. वारा ज्या दिशेने येईल
तिकडे वाहवत जातात, तर काही नात्यांना स्वतःचे "वजन' असते. कितीही
मतमतांतरे झाली, गैरसमजांची वावटळे उठली, तरी ते आपले स्थान सोडत नाही;
पण काही काही वेळेला नाती अपघातात सापडतात. ध्यानीमनी नसताना जरी
स्वतःच्या ड्रायव्हिंगची खात्री असली तरी वेगावर नियंत्रण राहत नाही,
विचार"चक्र' फुटते आणि गाडी भरकटते! कित्येकदा इतरांना ओव्हरटेक करण्याची
क्षमता आहे, असा अवाजवी विश्‍वास वाटतो; पण एका बेसावध क्षणी समोरून
येणाऱ्या परिस्थितीचा ट्रक आदळतो आणि नात्याला अपघात होतो. कधी तेथेच
प्राणज्योत मावळते, तर कधी ते "आयसीयू'मध्ये जातं...

हृदयाला झालेली जखम गंभीर असते. बराच वेळ लागतो परत नॉर्मल व्हायला आणि
नॉर्मलवर आले तरी कुठंतरी वेदनेचा व्रण राहतोच. परत थोडासा धक्‍का लागला
तरी ती वेदना बोलायला लागते, हुंदके देते, उसासे टाकते...

मला तरी वाटतं, नात्यानं जन्म घेतल्यावर ते चिरतरुण राहण्यासाठी
सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. रोजचा रियाज, मोकळेपणाची
स्वच्छ हवा, गैरसमजाच्या साथीचा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना,
सहनशक्तीची लस टोचणे आवश्‍यक आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम
विचारांचा खुराक देणे तितकेच महत्त्वाचे. कोरडेपणा येऊ नये म्हणून
भावनांची शिंपणही हवी. कधीकधी नात्याच्या रोपट्याला अनावश्‍यक विषयांच्या
फांद्या फुटतात त्या वेळीच छाटून टाकाव्या लागतात म्हणजे मूळ नात्याचा
समतोल ढळत नाही, नात्याचा "बोन्साय' होऊ द्यायचा की नाही आपण ठरवायचं...
थोडक्‍यात, नवीन जन्मलेले नाते जगवायचं, वाढवायचं, सुदृढ करायचं हे जसं
खरं, तसंच आधी जन्मलेले नातं त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेत टिकवायचं,
फुलवायचं हेही महत्त्वाचं. त्या सगळ्यासाठी करायला हवा "सारासार विचार',
वागणं- बोलणं, आचार- विचार साऱ्यात हवे. "तारतम्य' प्रत्येकानेच स्वतःशी
घेतली पाहिजे एक शपथ नाते जपण्याची!...

नातं कुरकुरायला लागले तर त्याला वेळीच तेलपाणी करायला हवं, ते
तुटेपर्यंत ताणायचं नाही, तसंच अगदी सैलही सोडायचं नाही. संबंधांचा रथ जर
वेगाने धावायला हवा असेल, तर नात्याची प्रत्येचा किती ताणायची नि किती
सोडायची याचे भान ठेवणे महत्त्वाचे! मग नात्यातलं चैतन्य चिरतरुण होते,
संजीवनी मिळाल्यासारखे!
 

Wednesday, March 28, 2012

आजचा माणूस...

आजचा माणूस...
आजचा माणूस कुठली गोष्ट सगळ्यात चांगली करायला शिकला असेल ना तर ती म्हणजे
'दुर्लक्ष्य करणे'...
'आपलं काही अडत नाहीये ना'... मग दुनिया गयी तेल बेचने हा यांचा Attitude ..
एक व्यक्ती आपल्या आयुष्याची ५-६ वर्ष civil services च्या exam च्या तयारी
साठी बहाल करतो.. खूप काही व्यक्तिगत सुखसोयींच बलिदान करून, अनेकांशी झगडून
तो शेवटी IAS/IPS बनतो..
आपलं संपूर्ण आयुष्यं देशाच्या सेवेसाठी प्रदान करतो..
काहीतरी चांगलं करायला जातो अन या भ्रष्ट नेत्यांच्या किंवा माफियांच्या हस्ते
मारला जातो..
आई बाप पुरते तुटून जातात... आयुष्यभर एकटेच झगडत राहतात..
शेजारी-पाजारी धीर देतात, कॉलोनीतले लोक हळहळ व्यक्त करतात आणि आजचा माणूस
(म्हणजे बाकी सगळेच)
"खूप वाईट झालं.. या देशाच काय होणार देव जाने" एवढ्या शब्दात दिलगिरी व्यक्त
करून सगळा भार देवावर टाकून, "स्व" ची काळजी करायला मोकळे होतात..

हीच माणसं मग dirty picture च्या show ला चार चार आठवडे गर्दी करतात..

सत्य तर हेच आहे...
की स्वतःला 'हुशार' म्हणवणाऱ्या आजच्या या माणसाला खरे "Hero" कोण आहेत हे
अजून ओळखताच आलेलं नाहीये..

दुखं एकाच गोष्टीच आहे...
आजचा माणूस 'हुशार' राहिलाच नाहीये...
तो दिवसेंदिवस "शहाणा" होत चाललाय...
चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणं नसतं।
उंच भरारी घेणा-यानां, आभाळाचे भय नसते।
खुप खुप ताकद लागते,आलेलं अपयश पचवायला।
डोळ्यात आलेलं पाणी पुसुन,ओठाँवर हसु खेळवायला।
करण्यासारखं खुप आहे,उमेद मात्र हवी।
मिळण्यासारखं ध्येय आहे,"जिद्द्"मात्र हवी!
 

शब्द

देता शब्दांना मी चाल
बनतात हातातली ढाल
शब्दांची करता आखणी
शोभे जणू चारोळी देखणी

देता शब्दांना आकार
दिसतो जणू अलंकार
शब्द शब्दातले अंतर
भारून मारलाय मंतर

शब्द शब्दाला जुडावा
देह शब्दासाठीच पडावा
जेंव्हा पडते शब्दात ढील
पाहून हसतात मिश्कील

लागे शहाण्या शब्दाचा मार
मारण्या नको ढाल तलवार
शब्द असे जालीम हत्यार
सुटता चिरी काळीज आरपार
 

Tuesday, March 20, 2012

याचंच नाव जीवन असत ....

चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक पुढे नि एक पाय मागे
पुढच्याला गर्व नसतो
मागच्याला अभिमान नसतो
कारण त्याला माहित असत
क्षणात हे बदलणार असत
याचंच नाव जीवन असत ....
*जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री*


*जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो*

*जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री आणि
फ़क्त प्रेम ..................*

कळतय मला हे बर नाही...!

*मन भरून येन, अस सतत झुरन
डोळ्या पानी येन, अस नेहमीच होण
कळतय मला हे बर नाही...

किती दिवस अस उदास राहणार
स्वताचे सुख दुसरयात शोध नार
कोणाची तरी वाट पाहणार..
त्या वाटे वर तर काहीच चाहुल नाही..

हसता हसता मधेच थांब ने
सगळ्यात असून एक्ट वाटने
सततची ही आठवण येणे..
ज्याच्या साठी झुराव त्याला तर
कश्याचाच पत्ता नाही..

का म्हणून कुणाची अशी वाट बघाव,
का कुणासाठी अस सतत झुराव
आपल मन तरी आपल्या ताब्यात असाव...
कुणाच्या असण्याचे ते बांधील नाही...

ठरवून हव तर मनसोक्त हसाव ...
नाहीच जमल तर भरपूर रडून घ्याव्..
कोणाशी तरी मनसोक्त बोलाव..
नसेल कोणी तर लिहित बसाव..
मग मात्र
दुःखाचे गाठोडे घट्ट बान्धाव..
दूर पाण्यात फिरकाउन दयाव..
की पुन्हा ते परत येणारच नाही..

अजूनही पुढे किती वाटा आहेत..
जग न्यासाठी नविन कारण आहेत..
आजुबाजुला बघा किती मानस आहेत...
आपल्याला जपणारी नाती आहेत..
आपल्याला जीव लावान्यारानहुन
मोलाच या जगात कोणीच नाही..*

सख्खे शेजारी

माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं, तर एक शहाणं!
वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल!

वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं!

वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धीराचं फळ त्याला हवं असतं!

वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजुतीच ओलाव्याने त्याला शांत करतं!

अश्रु

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस - याला विचारले ......
' ए आपण असे कसे रे
ना रंग , ना रूप ,
नेहमीच चिडीचुप ,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर ,
दु : खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर ,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला ,
किनारा ही नाही साधा या पापण्याला ............
दुस - यालाही मग जरा प्रश्न पडला ,
खुप विचार करून तो बोलला ,
रंग - रूप नसला तरी ,
चिडीचुप असलो जरी ,
आधार आपण भावनांचा ,
आदर राखतो वचनांचा ,
सान्त्वनांचे बोल आपण ,
अंतरीही खोल आपण ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे ,
दु : खाच्या प्रसंगी आपलेच महत्व ,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत ,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत ,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा ,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा ,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा ,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच ,
आपले बाहेर पड़णे भाग आहे ,
आपल्यामुलेच आज हे जग आहे .
अशीच आपली कहाणी .........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी .........................
जीवनात आलेल्या माणसांना कधीच पर्याय नसतो..... असते ती तडजोड....

कोणीही कितीही चांगला भेटला तरी गेलेल्या व्यक्तीची कमी भरून काढू शकत
नाही.... नवीन येणारी माणसे आधीच्यांपेक्षा जास्त सुख देत असतील कदाचित पण
माणूस फक्त सुखातच मोजता येत नाही ना.....??

त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, त्याचा सहवास, ती व्यक्ती नसण्याचे दु:ख सारं
युनिक असतं, ते परत कधीच मिळू शकत नाही.....

नवीन आलेल्या व्यक्तींसोबत अगदी तशाच प्रकारचा प्रसंग आला कि आपल्याला जुन्या
व्यक्तींची आठवण येणं साहजिकच....

आपण कधी कधी स्वतःलाच आठवत असतो... मी असा होतो..तसा होतो... आपण स्वतःच्या
गतकाळाची देखील कमी भरून काढू शकत नाही मग जीवनात येऊन गेलेल्या व्यक्तींची
कशी काढणार....???

Thursday, March 15, 2012

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे… 

मृगजळाचे भास...............

मृगजळाचे भास...............


गोड आठवणींमागाची रहस्य हळूहळू उलगडत जातात
आणि लक्षात येतात ते मृगजळाचे भास

सत्य माहित असूनही इच्छेअनुरुप स्वप्नं पाहण्याची सवय
पण, उशिरा लक्षात येतात खडबडून जागे करणारे वास्तवि काटे

चंद्र ढगाआड गेला म्हणून रात्रीला त्या आमावस्या म्हणत नाहीत
उन्हाळ्यात पाऊस आला म्हणून त्याला पावसाळा म्हणत नाहीत
एखाद्या भेटीत कोणी जरा गोड बोललं म्हणून त्याला "प्रेम" म्हणत नाहीत

सगळं कळत असत पण मन वळत नसत
नकाराला होकारातच बदलत असत
झाले वार कितीही तरी फुलांप्रमाणे झेलत असत
खूप वेड असत
त्याला सावरणं अवघड खूप असत...............
 

मन, कल्पना आणि आठवणं...

मन, कल्पना आणि आठवणं...
कुठलही भौतिक अस्तित्व नसणाऱ्या पण आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग
असणाऱ्या आणि स्वतःचं अस्तित्व वेळोवेळी दाखवून देणाऱ्या गोष्टी..
मन तर आपलं विचित्रच...
वर्गात 'नागरिकशास्त्राचा' period चालू असतांना कुठल्यातरी थंड हवेच्या ठिकाणी
'पर्यावरणशास्त्राचे' धडे गिरवणं या मनाला कसं जमतं देवच जाणे...
कल्पनेचं पण काही तसंच...
... व्यावहारिक जगाच्या सत्यांना सामोरं जाता जाता सर्व सुखं सोयींनी समृद्ध
असलेल्या काल्पनिक जगात आपल्याला नेण्याचं सामर्थ्य फक्त कल्पनेमधेच असतं...
अन आठवनीन बद्दल तर बोलायलाच नको...
सुखं आणि दुखं या दोन्ही परस्पर विरोधी भावनांची अनुभूती एकाच वेळी करून देणं
आठवणींनाच जमतं...
"आपल्याकडे कमीत कमी आठवणी तर आहेत" ही गोष्ट जेवढी सुखावणारी तेवढीच
"आपल्याकडे आता फक्त आठवणीच आहेत" ही गोष्ट दुखावणारी...
सुखद आठवणी जास्त त्रास देतात...

पण या गोष्टींना भौतिक अस्तित्व नाही तेच बरं..
कारण अस्तित्व सिद्ध झालेल्या गोष्टींच्या सीमा ठरवायची माणसांना वाईट सवय
असते...
अन सीमा ठरवल्या गेल्यात की बंधनं येतात..

काही गोष्टींना बंधनं नसलेलीच बरं...

क्षण तुझे अन् माझे

समोरच्या व्यक्तीने दिलेली सहानभूती दरवेळी आपले समाधान करेलच असे गरजेचे
नाही.
आयुष्याच्या काही क्षणी
"आपण पुरते फसलो आहोत, पण 'फसलो आहोत' असेही म्हणता येत नाहीयेय.
कारण जे मिळालंय ते मिळवण्याची मनापासून इच्छा होती.
जे आहे ते जीवघेणे नाहीयेय....पण ते जसे हवे होते,जसे अपेक्षित होते तसेही
नाहीयेय...
... सहानभूतीने थोडा धीर येईल पण आपली परिस्थिती जैसे थे तशीच राहणार आहे."
याची पूर्ण जाणीव झालेली असते.अश्या वेळी जवळ कुणी नको हवं असतं.
मनात आधीच विचारांची गर्दी असते,बाहेरची गर्दी स्वतःहून त्यात वाढवण्याची
मुळीच इच्छा नसते.
आपल्यावरच्या परिस्थितीच्या सर्व बाजू, सर्व +/- मुद्दे आपल्याला स्वतःला
माहित असतात,
पटतही असतात.....सुखासाठी तडजोड करावी लागणार ह्याची खात्री हि झालेली
असते.....
पण.......शेवटी एकच रुखरुख मनाला लागून राहते ती ह्याची गोष्टीची कि,
"सुखातही कधी कधी फसवणूक होते.."
कारण शेवटी.....
"तडजोडीने मिळालेल्या सुखात माणसाचे लक्ष सुखापेक्षा तडजोडीकडेच जास्त जाते."

Oxygen...

Oxygen...
प्राणवायू ... जगण्यासाठी अत्यावश्शक...
पण जर ठिणगी उडाली अन आग लागली तर त्या आगीला धगधगत ठेवणारा सुद्धा हाच
Oxygen...
भावनाप्रधान माणसांच्या मनाचं देखील काही असंच असतं...
जोपर्यंत त्यांची मन जपली जातात ना तोपर्यंत ते समोरच्याची जीवापाड काळजी
घेतात... पण एकदा का त्यांची मन दुखावली गेली की मग आग लागते... ती क्वचितच
दुसऱ्यांना जाळते.. बहुतेक वेळेस ती भावनाप्रधान व्यक्ती स्वतःच जळत राहते...
...

'किंमत'... भावनाप्रधान माणसांच Oxygen .. त्यावरच ते जगतात...
पण जेंव्हा त्यांची किंमत केली जात नाही तेंव्हा हाच Oxygen त्यांच्या
मनातल्या आगीला धगधगत ठेवतो...

Monday, March 5, 2012

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं
ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्यालाच ठाव असतं

तांबडी लाल माती नि हिरवी गार शेतं
कौलारू घरांची शाकारलेली छतं

कुठल्याश्या घरातून एक म्हातारी बोलावते
ओळखीचे कोणी नाही, हे पाहून तिची पापणी ओलावते

"कोणाची गं पोर तू? ये आत ये", म्हणते
वाकून भाकरी वाढताना जराशी कण्हते

तिच्या हातची चटणी- भाकरी लागते इतकी गोड
कारण त्यात असते माया नि आपुलकीची ओढ

भाकर खाताना माय पाठीवरून हात फिरवते
टचकन डोळ्यांत पाणी येतं नि आईची आठवण येते

बाहेर खाटल्यावर असतो एक म्हातारा
चीपटं- मापटं शरीर नि डोळ्यांपुढे अंधार सारा

जायची वेळ आल्यावर पाय निघता निघत नाही
आपण वळून पाहिलं नाही, तरी गाव पाहत राही

गाव सोडलं तरी मन गावीच राहतं
त्याच्या डोळ्यांनी ते सारं गाव पाहतं

प्रत्येकालाच गावी राहिलेले दिवस परत यावेसे वाटतात
गावची नुसती आठवण झाली तरी डोळ्यांत अश्रू दाटतात

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं

तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं

आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं

आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं

आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं
कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे "क्वारनटाईन" बटण असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते
बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो

आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत, पोचवणारा बाप एक संत असतो

आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं
बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं

कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आई गं SSS” असतं
आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बाप रे बाप" असतं

परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं

म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं

आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

Sunday, March 4, 2012

झाड...

झाड...
एक छान पाऊस पडतो अन जमिनीत लपलेल्या बीजांना अंकुर फुटतो... मग एक छोटंसं
रोपटं आपली मान धर्तीच्या वर काढतं... पण ते मोठं व्हायला कित्येक वर्ष
लागतात... नंतर कधीतरी एक लाकुडतोड्या येतो त्या झाडावर अनेक घाव करतो अन काही
तासात त्याचे लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करतो... त्या लाकडांची
राख करायला मग एक ठिणगीच खूप असते...

नात्यांचही काही तसंच असतं...
अश्याच कुठल्यातरी क्षणी काही भेटीगाठी होतात, त्यात गप्पांचा पाऊस पडतो अन
एका नवीन नात्याला अंकुर फुटतो... मग संवादाच्या निमित्ताने हे नातं आपली मान
वर काढतं... आणि हे नातं जपून ठेवायला वर्षानुवर्षे लागतात... त्याला जोपर्यंत
'विश्वासाचं' खत-पाणी दिलं जातं तोपर्यंत ते सुखरूप वाढतं... पण जर त्यात
'गैरसमज' आला तर मग त्या नात्याचे छोटे छोटे तुकडे होतात... कारण तेंव्हा घाव
सरळ मनावर होतात... आणि एकदा मनं बिघडली की मग त्या नात्याची राख व्हायला
संशयाची एक ठिणगीच खूप असते...

 

जगात तीन प्रकारची माणस असतात...

जगात तीन प्रकारची माणस असतात...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
अन
३. 'वाट' शोधणारे

शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...

काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट'
बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...

'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून
दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात... त्यांच्या आनंदाची परिसीमा
तेवढीच...

त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही
अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...
आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं....

इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!
 

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...

आयुष्यातले सगळेच निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकत नाही...
काही निर्णय अशे असतात जे घेऊन आपण परिस्थितीवर मात करतो... तर काही निर्णय
अशे असतात जे आपल्यावर 'लादून' परिस्थिती आपल्यावर मात करते...
पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी... कुठलाही निर्णय घेतल्यावर त्याचा परिणाम काय
होईल हे जसं आपण सांगू शकत नाही तसंच परिस्थितीने आपल्यावर लादलेल्या
निर्णयाचा परिणाम देखील काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही... खुद्द परिस्थिती
सुद्धा नाही... अमुक निर्णय परिस्थितीने लादला म्हणजे त्याचा परिणाम वाईटच
होणार हे जेंव्हा आपण गृहीत धरतो तेंव्हाच आपण परिस्थितीला आपल्यावर मात
करायची संधी देतो...

त्याउलट आपण एकच करावं... पूर्ण ताकदीनिशी झगडावं आणि खंबीरपणे परिस्थितीला
सामोर जावं... ही लढाई प्रत्येकवेळेस तुम्ही जिंकालच असे नाही... कधी
परिस्थितीही जिंकेल.. पण atleast लढता लढता हारल्याच समाधान तर मिळेल... आणि
हेच समाधान तुम्हाला पुढच्या लढाईसाठी सज्ज होण्याची शक्ती सुद्धा देईल...


 

मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये !!!

कडक उन्हात चालावं लागलं कधी तर थकून जाऊन थांबू नकोस... चालत रहा..
कारण मी कडक उन्हानंतर पडणारा मुसळधार पाऊस पाहिलाय...

चालतांना टोचलेत काटे जरी तरी चालत रहाणं थांबवू नकोस...
कारण मी काट्यांना फुलांचं रक्षण करतांना पाहिलंय...

वाटेत आले कितीही अवरोध तरी बावरून वगैरे जाऊ नकोस...
कारण मी अवरोधांना अनेक 'अपघात' होणं टाळतांना पाहिलंय...

गमावलस जरी बरंच काही तरी त्याच्या शोकात हरवून जाऊ नकोस...
कारण सर्व पान झडलेल्या वृक्षांना मी नवीन अंकुर फुटतांना पाहिलंय...

झालाच कधी अंधार आयुष्यात तर स्वतःला असहाय्य मानू नकोस...
कारण मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये...

मी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ होतांना पाहिलीये !!!

आपली सावली...

आपली सावली...
पण तिला आपली म्हणणं कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
ती सावली... ती आपली नसतेच मुळी... तिचं नातं सूर्याशी.. त्याच्या
प्रकाशाशी... सूर्य डोक्यावर आला की तीही आपल्या पायाखाली कुठेतरी लपून
बसते... आपल्याला चटके खायला एकट सोडून... अन सूर्य अस्ताला आला की ती आपले
पांग पसरते... आपण असतो त्यापेक्षा दुप्पट जागा ती व्यापते... मग तिला आपलं
म्हणावं तरी कसं... ती अंधारात आपली साथ सोडते म्हणतात... अरे पण मी म्हणतो
त्या अंधाराला का उगीच दोष... त्याचा गुणधर्मच तो... आणि सावली तरी नेमकी काय
हो... तो सुद्धा अंधारच... रंगीत सावली पाहिलीये का कधी !!
सगळा आपल्या विचारांचा अंधार...
शेवटी आपलं असतं कोण... कुणीच नाही... आपले आपणच असतो ... बस्स !!!!

--

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे…

मी

निळ्या स्वप्नात रमणारा मी
स्वप्न पहाट उजाडण्याची वाट पाहतो
भावनांच्या ओल्या वाळूवर
पावलांचे ठश्यावर ठसे उमटवतो !!
बेचैन वेदनेत रमणारा मी
ओल्या दवात भिजत राहतो
पावसात खेळता खेळता
ओले पाय किनार्यावर रुतवतो !!
रात्रीचे उसाशे पेलणारा मी
वेदनांचे हुंकार झेलीत राहतो
पंख मिटल्या झोपड्यांचे
दुःख अनुभवत राहतो
जीवनाचे संदर्भ कधी शोधतो
तर कधी मोजत राहतो ......