Saturday, February 2, 2013

आयुष्य खूप सुंदर आहे

 स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं* ,
*विश्वास उडाला कि आशा संपते* ,
*काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं*..
*म्हणून स्वप्नं पहा* ,
*विश्वास ठेवा आणि काळजी घ्या* ,
 *आयुष्य खूप सुंदर आहे*… *

मैत्रीचा प्रवास

मनुष्य येतो जन्माला , भेटतो रक्ताच्या नात्यांना
ओळख होतांना जगाची, दिसते वाट मैत्रीची

जीवनाच्या वाटेवर..
मित्रांच्या सायकलीवर , 'डबलसीट', सुरु होतो मैत्रीचा प्रवास..

धावतात चिमुरडी पावलं आनंदाने
लपाछपी खेळतांना सापडतात गडी नवे
रुसवा फुगवा,देवघेव,दुखणे खुपणे
शाळा,छंदवर्ग अनेक मित्र-मैत्रिणी जोडे

महाविद्यालय जेव्हा दिसे कोप-यावरी
बेभान वा-यापरी मैत्री तेव्हा मनाला खुणवी
कँटीन,कट्ट्यांवर जरी होई उनाडकी
दोस्तांसवे अभ्यास भावी जीवनाचा पाया रची

ढिली होते पकड दोस्तीची, हाती पदवी पकडतांना
राहतात जुने दोस्त मागे , पोटापाण्यासाठी पळतांना
जुळतात मैत्रीचे बंध नवे , नोकरीत स्थिरावतांना
भेटते मैत्री अनोखी , ऑफिसात ओर्कुटींग करतांना

सावकाश , निवॄत्तीचा नारळ जेव्हा हातात पडतो
मॉर्निंगवॉक मित्रमंडळ तेव्हा साथ करतो
उगवता सूर्य बालपणीच्या मैत्रीची आठवण देतो
मावळतांना तारुण्यातल्या मैत्रीची हुरहुर लावतो

प्रकटतो मग, जन्मापासूनचा ' मित्र '..

अनंताच्या वाटेवर..
यमाच्या रेड्यावर ,'डबलसीट', सुरु होतो 'परत' मैत्रीचा प्रवास

आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे

*आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंगमनात आपोआप निर्माण झाले पाहिजेत. झऱ्याप्रमाणे तो मनात पाझरला पाहिजे, ज* *ीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहज प्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनीयशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंदही मिळत नसतो. आनंदानंउंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हातरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे! ................ एक तरुणी रस्त्यानं एकटीच चालत होती. चेहरा उदास होता. स्वत:वरच नाराज होती.आसपास वसंताचा फुलोरा फुलला होता. प्रत्येक झाड नवी, कोवळी, हिरवी, पोपटीपालवी लेवून चैतन्यानं सळसळत होतं. पक्ष्यांचा गोड किलबिलाट चालू होता, परंतुतिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ती स्वत:च्या विचारात होती. तिच्या मनात शल्य सलतहोतं की आपण संुदर नाही. 'माझ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड्स आहेत. परंतु, मलाचनाहीत. त्या सर्व आनंदी आहेत. मी सुंदर नसल्यानं मला बॉयफ्रेंड नाही.' या विचारांमध्ये ती गढली असतानाच वाऱ्याची झुळूक आली, तिच्या कपाळावरील बटा उडूलागल्या, नाचू लागल्या. तिच्या कानात हळूच, प्रेमानं गुंजारव करत झुळूक तिलाम्हणाली, 'माझ्या मुली, तू माझ्यासमवेत उडत चल, विचारांमध्ये गुंतून खिन्न बनूनबसू नको. मग तूही फुलत जाशील.' केवळ देहाच्या सौंदर्याकडं पाहात बसू नको, असंसमजावण्याचा प्रयत्न ती करू लागली. वाऱ्याची ती झुळूक इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी सर्वत्र पिंगा घालत होती. एकाजागी थांबायला तयार नव्हती. जीवन विशाल आहे. एका जागी, एका विचाराला तू चिकटूनराहू नको. शरीर आणि मनानं चालत राहा, फिरत राहा. हेच जीवन आहे. झुळूक तिलापटवण्याचा प्रयत्न करू लागली, 'हे बघ, मी आनंद मिळवण्यासाठी इकडून तिकडे फिरतनाही, तर आनंदानं बेहोष होऊन सर्वत्र फिरत आहे. माझ्या मनात निर्माण झालेलाआनंद व्यक्त करत आहे, आनंदाचा झरा माझ्या मनातच आहे. माझं मन आनंदानं इतकं भरूनगेलं आहे, की मला काय करू आणि काय नको, असं झालं आहे. माझं हे नृत्य, नाच,पिंगा त्याचं प्रतीक आहे. आनंदापोटी हे घडत आहे. आनंद मिळविण्यासाठी मी हे करतआहे, असं तुला वाटत असेल, तर ते चूक आहे. आनंद हा मिळवता येत नाही, आनंद हीसहजप्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण व्हावेत. जीवनातयशस्वी होणं, हीसुद्धा सहजप्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वीबनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंद मिळत नसतो. आनंदानं उंच उंचझोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हेलक्षात घेणं अत्यावश्यक आहे!' तुमच्या अंगी असलेली प्रवृत्ती अधिक महत्त्वाची आहे. अंगी योग्य वृत्ती असेल तरतुमचं मन नेहमीच प्रफुल्लित राहील. तुमच्यापुढं निर्माण होणाऱ्या समस्या कधीमोठ्या नसतात, तुम्ही मोठे असतात. समस्यांचे बळी बनता कामा नयेत, तर यासमस्यांवर विजय मिळविता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. एखादी सोपी गोष्ट अवघड बनू शकतं. त्यास दुसरं कोणी जबाबदार नसतं, तर तुमचादृष्टिकोन जबाबदार असतो. तुमच्या अंगी चांगली, विधायक प्रवृत्ती असेल तर अवघडकामही आव्हान ठरू शकतं! तुम्ही वागण्याची पद्धत बदला. एका पब्लिक स्पीकिंग क्लासमध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षकानंसांगितलं, 'तुमच्या बोलण्यात स्वर्गाचा जेव्हा उल्लेख येईल, त्यावेळी तुमचाचेहरा आनंदानं धगधगला पाहिजे, तळपला पाहिजे. डोळे चमकले पाहिजेत, ओठ थरथरलेपाहिजेत.' हे ऐकून एका युवकानं शंका विचारली, 'नरकाचा उल्लेख आला तर चेहऱ्यावरकसे भाव हवेत?', त्यावर प्रशिक्षकानं उत्तर दिलं, 'त्यासाठी तुमच्याचेहऱ्यावरील नेहमीचे भाव पुरसे आहेत!' एक लक्षात घ्या, विधायक विचार हा जीवनाचा फार मोठा ठेवा असतो. तुमचं मन, विचारबदला. मनात नेहमी चांगले विचार राहू द्या. निराशावाद्याला कधीच चांगली संधीसापडत नाही आणि आशादायी माणसाला अडचणींमध्येही संधी सापडते. जेव्हा एक दरवाजाबंद होतो, त्याचवेळी संधीचा दुसरा दरवाजा उघडतो. जीवनावर विश्वास ठेवा. तुमचंजीवन सहज, हलकं, तरंगतं, कसं बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, जीवनाशी झगडत राहूनये, तुम्ही लहरींशी लढत बसू शकत नाहीत, परंतु, लहरींवर तरंगू शकता. तुम्ही मनातील भावना बदलू शकता. तुमच्या जीवनाचा दर्जा, तुमच्या मनात सातत्यानंनिर्माण होणाऱ्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना खालावत जातात, त्यावेळीत्यात बदल घडवून आणा. जीवनातील आनंदी घटना आठवा. जीवनमूल्यांमध्येही बदल घडवून आणा. जीवनातील चांगुलपणा आणि समाज यांना जोडणारीमूल्यं जोपासा. अनेकजण अपयशाला, मरणाला, असुरक्षिततेला, नकाराला भितात.दृढनिश्चयानं पुढे या, मग तुम्हाला समजेल की, अपयश म्हणजे दुसरं काही नसून पुढंसरकलेलं यश आहे. अपयश हे यशासाठी घातलेलं खतपाणी आहे. तुम्ही तुमच्या जीवनातऊर्जा आणली तर ही ऊर्जा तुम्हाला मनातील अपयशाची भीती घालविण्यास मदत करील.तुम्ही भीतीचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, भीती ही नेहमीविचारांची चालना आहे आणि विचार म्हणजे मानसिक शब्दांना मिळणारी चालना आहे. अशाया भीतीचे, भीतीदायक विचारांचे गुलाम होऊन बसता. जर तुम्हाला धाडसाची आवड असेलतर असुरक्षिततेतून मार्ग काढण्याचे आव्हान तुम्ही सहज पेलू शकाल. मग तुम्हालाअशा या असुरक्षितेतही गंमत वाटेल. * *अनुवाद : जॉन कोलासो*

काही माणसे

*काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

...काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

हवा असतो

*निसर्गाला रंग हवा असतो,
फुलाला सुगंध हवा असतो,
मातीला गंध हवा असतो,
मित्रा..............
माणूस तरी एकटा कसा रे राहणार...
त्यालाही एक मैत्रीचा बंध हवा असतो.........
**

खरा आनंद असतो!!!!

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....


मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत

एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

उपदेश

*उपदेश देयला सगलेच असतात
मात्र समजून घेणार कोणीच का नसते
सुखात सगलेच सहभागी होतात
पण दुखत मात्र अदृश्य का होतात
जीवंत असताना कोणीच जवळ नसते
मग मेल्यावर का सगळे एकत्र येतात
हे आयुष्य असे का असते
जिथे गरज असताना कोणीच का नसते.....??*

हवं असतं

*जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं, आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे
आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो, याचंच नाव 'आयुष्य'
असतं...!*

जगणं

बेधुंद आणि निरागस जगणं काय असतं हे समजायचं असेल ना तर आपण आपलं बालपण
आठवावं...

तेंव्हा कुठल्याच गोष्टीला 'अर्थ' नसायचा... कुठलीही गोष्ट 'का' करायची हा
प्रश्न नसायचा...

मग ते मातीत/चिखलात खेळणं असो, की मांजरीला जाऊन बेधडक धरणे असो...
घराच्या अंगणात मनसोक्त बागडणं असो की गुढ्ग्याची टोपर फुटूस्तर धडपडण असो...

पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं हे जग आपल्याला अर्थ शोधायची सवय
लावतं... निरर्थक गोष्टींमध्ये अर्थ शोधण्याच्या नादात आपण त्या 'निरागस'
स्वतः ला कुठेतरी हरवून बसतो... मग ही व्यवहारी दुनिया 'फायदा' या शब्दाचा
आडोसा घेऊन त्या 'स्व' मधेच सर्व ‘अर्थ’ आहे हे आपल्या डोक्यात भरवते... इथेच
सगळा घोळ होतो...
कारण जेंव्हा 'स्व' आणि 'अर्थ' हे शब्द जुळतात तेंव्हा त्याचा 'स्वार्थ'
होतो... आणि एकदा स्वार्थ आलं म्हणजे तिथे निरागसतेला स्थान रहात नाही...मग
बाकी गोष्टी तश्यापण निरर्थकच !!!!

झाड...

झाड...
एक छान पाऊस पडतो अन जमिनीत लपलेल्या बीजांना अंकुर फुटतो... मग एक छोटंसं
रोपटं आपली मान धर्तीच्या वर काढतं... पण ते मोठं व्हायला कित्येक वर्ष
लागतात... नंतर कधीतरी एक लाकुडतोड्या येतो त्या झाडावर अनेक घाव करतो अन काही
तासात त्याचे लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करतो... त्या लाकडांची
राख करायला मग एक ठिणगीच खूप असते...

नात्यांचही काही तसंच असतं...
अश्याच कुठल्यातरी क्षणी काही भेटीगाठी होतात, त्यात गप्पांचा पाऊस पडतो अन
एका नवीन नात्याला अंकुर फुटतो... मग संवादाच्या निमित्ताने हे नातं आपली मान
वर काढतं... आणि हे नातं जपून ठेवायला वर्षानुवर्षे लागतात... त्याला जोपर्यंत
'विश्वासाचं' खत-पाणी दिलं जातं तोपर्यंत ते सुखरूप वाढतं... पण जर त्यात
'गैरसमज' आला तर मग त्या नात्याचे छोटे छोटे तुकडे होतात... कारण तेंव्हा घाव
सरळ मनावर होतात... आणि एकदा मनं बिघडली की मग त्या नात्याची राख व्हायला
संशयाची एक ठिणगीच खूप असते...

जीवनात आलेल्या माणसांना कधीच पर्याय नसतो..... असते ती तडजोड....

कोणीही कितीही चांगला भेटला तरी गेलेल्या व्यक्तीची कमी भरून काढू शकत
नाही.... नवीन येणारी माणसे आधीच्यांपेक्षा जास्त सुख देत असतील कदाचित पण
माणूस फक्त सुखातच मोजता येत नाही ना.....??

त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, त्याचा सहवास, ती व्यक्ती नसण्याचे दु:ख सारं
युनिक असतं, ते परत कधीच मिळू शकत नाही.....

नवीन आलेल्या व्यक्तींसोबत अगदी तशाच प्रकारचा प्रसंग आला कि आपल्याला जुन्या
व्यक्तींची आठवण येणं साहजिकच....

आपण कधी कधी स्वतःलाच आठवत असतो... मी असा होतो..तसा होतो... आपण स्वतःच्या
गतकाळाची देखील कमी भरून काढू शकत नाही मग जीवनात येऊन गेलेल्या व्यक्तींची
कशी काढणार....???
*जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री*


*जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो*

*जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री आणि
फ़क्त प्रेम ..................*

काही नाती

*जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....!!!"*
" ओठांवर हास्य, बगलेत सुरी, नजरेत आपलेपणा, काळजात विष, विंचवाच्या
नांगीत विष तर सापाच्या डोक्यात विष.......!!! जनावरांच्या बाबतीत पटकन
सांगता तरी येत.......!!! 'माणूस' हा एकच असा प्राणी आहे की त्याच 'विषाच
मर्मस्थान' सापडलेल नाही........"

एवढसं स्वप्न

एवढसं स्वप्न पापणी मध्ये निजतं...
पापणी उघडताच सत्यबाहेर पडतं .....
पाखरु होऊन आभाळाला भिडतं....
वेळ संपल्यावर सर्वकाही उमजतं ....
यालाच कुणी तरी "जीवन" अस म्हणतं.

आयुष्यात

"आयुष्यात वाढणे हे अनिवार्य आहे पण पुढे
जाणे हे वैकल्पिक" आणि पुढे जायचे असेल तर
एक वास्तव लक्षात ठेवणे गरजेचे आहे
की बदल जसा निसर्गाचा नियम आहे
तसाच बदल हा विकासाचा देखील नियम
आहे......................